शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

पश्चिम विदर्भात जलसंकट गडद : ५२ तालुक्यांतील भूजलपातळीत २० फुटांपर्यंत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 17:25 IST

सरासरीपेक्षा कमी पावसाने यंदा अमरावती विभागातील ५६ पैकी ५२ तालुक्यांतील भूजलपातळी २० फुटांपर्यंत घटली आहे.

  - गजानन मोहोड 

अमरावती - सरासरीपेक्षा कमी पावसाने यंदा अमरावती विभागातील ५६ पैकी ५२ तालुक्यांतील भूजलपातळी २० फुटांपर्यंत घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी अखेरीस ६८० निरीक्षण विहिरींतील स्थिर पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या व त्याआधारे पाच वर्षांच्या तुलनात्मक नोंदीद्वारे हे निरीक्षण नोंदविले आहे. पावसाळ्यात अमरावती विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ७७८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. ही टक्केवारी ८५ आहे. अकोला व वाशिम जिल्ह्याने सरासरी पार केली असली तरी अमरावती जिल्ह्यात ७७ टक्के, यवतमाळ ७८ व वाशिम जिल्ह्यात ६९ टक्के पाऊस कोसळला. त्यामुळे ५२ तालुक्यांत भूजलपातळी २० फुटापर्यंत घटली आहे. भूजलाचे पुनर्भरण पुरेसे न झाल्याने या तालुक्यांमध्ये ही स्थिती ओढवली. तथापि, यवतमाळ जिल्ह्यातील चार तालुक्यांत एक मीटरपर्यंत पाणीपातळीत वाढ झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार, ५६ तालुक्यांपैकी २६ तालुक्यांमध्ये एक मीटरपर्यंत, २० तालुक्यांमध्ये दोन मीटरपर्यंत व सहा तालुक्यांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे. अमरावती जिल्ह्यात १२, अकोला जिल्ह्यात सात, वाशिम जिल्ह्यात एक, बुलडाणा जिल्ह्यात १३, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये भूजलात तूट आढळून आलेली आहे.

बसाल्ट खडकाने भूगर्भात पाणी साठवण क्षमता कमीविभागाची भूगर्भीय स्थिती पाहता, किमान ८२ टक्के भूभाग हा ‘बसाल्ट’ या कठीण या खडकाने व्यापला आहे. यात पाणी साठवण क्षमता कमी आहे. मात्र, यात भेगा व सांधे निर्माण झाल्याने थोडी फार साठवण होते. भूपृष्ठीय रचना व भूगर्र्भीय स्थितीवर झालेल्या पर्जन्यमानाचे भूजलात रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. मात्र, या साठ्यातून सिंचन, औद्योगिक वापर, शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी यामुळे भूजलाचा वारेमाप उपसा होत आहे. तालुक्यांची स्थिती गंभीरविभागात भूजलात सर्वाधिक ७.८३ मीटरने घट अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात आलेली आहे. अकोट ४.०८ व बाळापूर ३.४६, अमरावती जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात ५.९८, चांदूर बाजार ४.१८, दर्यापूर ३.८५ मीटर, तर उर्वरित तालुक्यात दोन मीटरपर्यंत तूट आलेली आहे. याव्यतिरिक्त यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, महागाव, मारेगाव व आर्णी या तालुक्यात भूजल पातळी सरासरीइतकीच स्थिर आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भ