शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची ‘दमदार’ वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : प्रारंभी शहरी भागात हातपाय पसरणाऱ्या कोरोना संसर्गाने आता ग्रामीण भागाला विळख्यात घेतले आहे. जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : प्रारंभी शहरी भागात हातपाय पसरणाऱ्या कोरोना संसर्गाने आता ग्रामीण भागाला विळख्यात घेतले आहे. जिल्ह्यातील १४पैकी अनेक तालुक्यांमध्ये शहरीपेक्षा ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत आहेत. आरोग्य विभागाकडून ‘झिरो डेथ मिशन’ बरोबरच ॲन्टिजेन चाचणीही केली जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यापासून शहराच्या बरोबरीनेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. गतवर्षी पहिल्या लाटेत शहरी भागातच मोठ्या संख्येने रुग्ण होते. यावेळी मात्र अगदी वाडी, वस्ती, तांड्यावरही रुग्ण आढळत आहेत. दिनांक १ ते २५ एप्रिल या कालावधीत ग्रामीण भागातील १४ तालुक्यांमध्ये ७ हजार ५९२ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. यापैकी आजघडीला ४,०४८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर याच कालावधीत १२८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. संसर्ग उद्भवणाऱ्या गावांमध्ये ॲन्टिजेन चाचणी शिबिर घेण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाची रुग्णसंख्या गत महिनाभरापासून शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून येत आहे.

बॉक्स

गप्पांचे फड

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावांमध्ये लोक एकत्र बसून गप्पांचा फड रंगवत आहेत. कुठे मनोरंजनपर खेळ सुरू आहेत. असे एकत्र आल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून, शहरासोबतच ग्रामीण भागातही संचारबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.

बॉक्स

तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्णसंख्या

वरूड ७६८, धारणी ४०६, मोर्शी ३६२, अचलपूर ३५७, चांदूर रेल्वे २९४, धामणगाव रेल्वे २७१, चिखलदरा २४८, अंजनगाव सुर्जी २४६, तिवसा २३४, चांदूर बाजार २३२, दर्यापूर २२१, नांदगाव खंडेश्वर १६७, अमरावती १२८, भातकुली ९६ अशी तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्णसंख्येची नोंद २५ एप्रिलच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालात झाली आहे.