शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विदर्भात वाघांच्या तृष्णेसाठी वनविभागाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 11:42 IST

यंदा उन्हाळा अधिक तापणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देरान धगधगतेयआटत आहेत नैसर्गिक पाणवठे

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजिवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पहिल्यांदाच मार्चमध्येच नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने यावर्षी विदर्भातील वाघांची तृष्णा भागविणे वनविभागासाठी जिकरीचे ठरणार आहे.राज्यातील एकूण सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे पाच व्याघ्र प्रकल्प विदर्भात, तर सह्याद्री पश्चिम महाराष्ट्रात आहे. यंदा उन्हाळा अधिक तापणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धनासह पाणी उपलब्ध करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. नैसर्गिक पाणवठे पाणी आटू लागल्याने कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती युद्धस्तरावर केली जात आहे. मेळघाट, ताडोबा-अंधारी या व्याघ्र प्रकल्पात पाणीसमस्या गंभीर स्वरूप धारण करणार आहे. परिणामी काही भागात टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजनदेखील करण्यात आले. वाघांची तहान भागविताना निधीची कमतरता पडू नये, याची दक्षता वनाधिकारी घेत आहेत.रान धगधगत आहे. काही जंगलांना आगी लागण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे एप्रिल व मे हे दोन महिने वन्यजिवांचे संरक्षण करताना वनविभागाला कसरत करावी लागणार आहे.जंगलात ५ ते १० कि.मी. अंतरावर कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत. काही पाणवठ्यांवर सौरऊर्जेवर स्वयंचलित हातपंपाद्वारा पाणीपुरवठा केला जाईल. कृत्रिम पाणवठे तयार करताना प्लास्टिकचे आवरण, माती व पाणी साठवण्याची व्यवस्था राहणार आहे. हल्ली व्याघ्र प्रकल्पात विशिष्ट ठरावीक भागातच नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यामुळे वन्यजिवांची एका भागातून दुसऱ्या भागात पाण्यासाठी भटकंती होऊ नये यानुसार कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली जात आहे.

विषप्रयोगाच्या तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपरकृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोग करून वन्यजीवांची शिकार करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यातील पाणी १२ तासांपेक्षा अधिक काळ साठवून राहता कामा नये. पाणवठ्यात कुणी विषप्रयोग केला असेल, तर ते तपासून पाहण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना तांबडा लिटमस पेपरचा वापर करण्याच्या सूचना आहेत. पाणवठ्यात विष टाकले असेल, तर लिटमस पेपरचा रंग लाल होतो, या विषप्रयोग तपासणीच्या टिप्स आहेत.

वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती होणार नाही, ही दक्षता घेतली जात आहे. व्याघ्र प्रकल्प अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यासोबतच शिकाऱ्यांवरही लक्ष आहे.- सुनील लिमये,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर.

टॅग्स :Tigerवाघ