शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

आंबेडकरी गझलेचा आरंभबिंदू वामनदादा कर्डक; संमेलनाध्यक्ष प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:03 IST

आंबेडकरी गझल संमेलनाचे थाटात उद्घाटन

अमरावती : वामनदादांची गीतरचना अभ्यासली तर बाबासाहेबांची चळवळ, वामनदादांची गीते आणि गझलरचना यांचे संमीलन झाले आहे असे दिसते. यालाच इंग्रजीत ‘फ्युजन’ असे म्हणतात. बाबासाहेबांच्या चळवळीत ऊर्जा आणि क्रांती यांचे संमीलन झाले होते. तसेच बाबासाहेबांची चळवळ आणि वामनदादांची गीत-गझलरचना यांचे संमीलन झाले आहे. आंबेडकरवादावर अधिष्ठित काव्यलेखन करणारे आणि १९३८ पासून गझललेखन करणारे वामनदादा हेच आंबेडकरी गझलेचे आरंभबिंदू असल्याचे प्रतिपादन प्रमोद वाळके यांनी रविवारी येथे केले.

अमरावती येथे आयोजित अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या आंबेडकरी गझल संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे उद्घाटक डॉ. इकबाल मिन्ने, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, प्रमुख अतिथी अशोक बुरबुरे, डॉ. सीमा मेश्राम, नंदकिशोर दामोदर आणि महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे उपस्थित होते.

पुढे बोलताना वाळके म्हणले की, भारतात धार्मिक जीवनाची पुनर्स्थापना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अंगांनी ते प्रयोगही करीत आहेत. या प्रयोगावर मात करण्यासाठी जसे आंबेडकरी कविता, आंबेडकरी वैचारिक लेख प्रयत्न करीत असतात तसे किंबहुना त्याहून अधिक धैर्यशील प्रयत्न आंबेडकरी गझल करीत आहे. वामनदादांच्या प्रत्येकच गीत-गझलेमध्ये आंबेडकरवादाची सर्वकल्याणकारी भूमिका दिसून येते. त्यामुळेच वामनदादांनी लिहिलेल्या गझलांना आंबेडकरवादी गझल असे मी नाव दिले आहे. ज्या गझलांमधून सर्वकल्याणाचा, शोषणमुक्तीचा विचार येत नाही ती आंबेडकरी गझल होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

संमेलनाचे उदघाटक डॉ. इकबाल मिन्ने म्हणाले, आंबेडकरवादाच्या विचारप्रवाहाने जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, देश, प्रदेश, भाषा यांच्या पलीकडे जाऊन, या साऱ्या मर्यादा ओलांडून मानवाला त्याच्या दुःखापासून मुक्ती देण्याची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे माणसाला दुःख आणि वेदनामुक्त करण्यासाठी आंबेडकरवाद हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.

यावेळी अशोक बुरबुरे, आशा थोरात, महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. सीमा मेश्राम यांनीसुद्धा समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक रोशन गजभिये, संचालन विजय वानखेडे यांनी केले तर आभार राजेश गरुड यांनी मानले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकAmravatiअमरावती