शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

पाणीपुरवठा योजनेत घोळ दोषींची खातेनिहाय चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:56 IST

चांदूरबाजार तालुक्यातील कुºहा येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामात स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा झाल्या प्रकरणी खातेनिहाय चौकशी केली जाईल, अशी भूमिका मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांनी बुधवारी घेतली. २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता, हे विशेष.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्थायी समितीत प्रशासन प्रमुखांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील कुऱ्हा येथे पाणीपुरवठा योजनेच्या कामात स्थानिक पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा झाल्या प्रकरणी खातेनिहाय चौकशी केली जाईल, अशी भूमिका मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री यांनी बुधवारी घेतली. २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता, हे विशेष.जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा २० मार्च रोजी विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. यावेळी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुनील डिके, सुहासिनी ढेपे, सीईओ मनिषा खत्री, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ नारायण सानप आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत चांदूरबाजार तालुक्यातील कुºहा येथे पाणीटंचाई योजनेंतर्गत सन २०१७-१८ मध्ये पाणीपुरवठा योजनेचे १४ लाख ५० हजार रूपयांचे काम मंजूर करण्यात आले. त्यानुसार या गावात मंजूर असलेली, मात्र न केलेल्या कामांचेही ८.५० लाख रुपयांची देयके काढल्याची बाब उघडकीस आली. त्यावेळी या कामांची झेडपी स्तरावरून केलेल्या चौकशी समितीनेही पाणीपुरवठा योजनेतील घोटाळा असल्याचे अहवालातून शिक्कामोर्तब केले. कुऱ्हा येथे १४.५० लाख रूपयांच्या कामात २२५० फूट पाईप लाइनच्या कामापैकी प्रत्यक्षात १७०० फुटांचे काम केले. यामध्ये लोखंडी पाइपचा अंतर्भाव असताना कुठेही लोखंडी पाईप टाकलेले नाही. सिमेंट क्राँक्रिटीकरण आवश्यक असताना तेही केले नाही. टीनशेड, पॅनल बोर्ड, मीटर, मेन स्विच लावले नाही. असे सुमारे १४ लाख ५० हजार रूपयांपैकी ८.५० लाख रूपये कामे केलेली नाहीत. तरीदेखील देयके पूर्ण काढण्यात आले आहेत. कुऱ्हा येथे लाखो रूपयांची पाणीटंचाईची कामे केल्यानंतरही गावकऱ्यांना पाण्याचा थेंब मिळाला नाही. यात घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावर बबलू देशमुख यांनी सीईओचे लक्ष वेधले. तेव्हा या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाईची मागणी देशमुख यांनी सभागृहात केली. दरम्यान सीईओंनी दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.चांदूर बाजार तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, औषध निर्माण अधिकारी राजेंद्र राठी, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत फुसे व एका महिला अधिकाऱ्यांविरुद्ध विनयभंग व जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदविली होती. चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविले. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर जी कारवाई केली. ती अयोग्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी स्थायी समिती सभेत विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांनी सभागृहात केली. त्यास काँग्रेसचे गटनेता व पदाधिकारी यांनीही समर्थन देत डीएचओ व झेडपी प्रशासन सोबत पदाधिकारी व सदस्य असल्याचे सभागृहात सांगितले. या प्रकरणी सीईओ मनीषा खत्री यांनीही तक्रारकर्त्या महिलेवर प्रशासनामार्फत योग्य कारवाई केली जाण्याची ग्वाही सभागृहात दिली. यावेळी सभेत बांधकाम, मग्रारोहयो याही विभागाचे मुद्द्यावर पदाधिकारी व सदस्यांनी चर्चा केली. सभेला डेप्युटी सीईओ दिलीप मानकर, माया वानखडे, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे, राजेंद्र सावळकर, प्रमोद तलवारे, शिक्षणाधिकारी आर.डी तुरणकर, विजय राहाटे व अन्य खातेप्रमुख तसेच बीडीओ उपस्थित होते.पाणीटंचाईत कुचराई नकोचसध्या उन्हाळयाचे दिवस आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. अशातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व कामात प्रशासकीय यंत्रणा गुंतली आहे. परंतु, पाणीटंचाईच्या समस्या निवारणार्थ कु ठलीही कुचराई प्रशासनाकडून होता कामा नये, अशी सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी स्थायी समिती सभेत पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना केली.जीएसटीचा तिढा सोडवाजिल्हा परिषदमार्फत करण्यात येणाºया विविध विकासकामांत १२ टक्के जीएसटीची कपात केली जात आहे. परंतु, ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर जीएसटी कपातीचे पैसे पडून आहेत. त्यामुळे याप्रकरणी प्रशासनाने तोडगा काढण्याचा मुद्दा सदस्य सुनील डिके यांनी मांडला. यावर योग्य कारवाईचे आश्वासन वित्त अधिकारी रवींद्र येवले यांनी दिले.