शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाने आदर्श गाव योजना राबवावी

By admin | Updated: November 16, 2014 22:43 IST

लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन आदर्श गाव योजना प्रभावी पद्धतीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले.

आनंदराव अडसूळ यांचे प्रतिपादन : सांसद आदर्श गाव योजनेचा घेतला आढावाअमरावती : लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करुन आदर्श गाव योजना प्रभावी पद्धतीने पूर्ण करावी, असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केले. आदर्श गाव योजनेअंतर्गत यावली (शहीद) हे गाव निवडण्यात आले असून त्यामध्ये कोणते विकास काम प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांसद आदर्श गाव योजनेचे महत्त्वाचे सात घटक असून त्यामध्ये वैयक्तिक विकास, मानव विकास, सामाजिक विकास, मूलभूत सूविधा स्वच्छ प्रशासन आदींचा समावेश आहे. यावेळी यावली (शहीद) ला असलेल्या ऐतिहासिक परंपरेमुळे आपण या गावाला प्राधान्य देत असल्याचे खासदार अडसूळ यांनी सांगितले. प्रामुख्याने गावातील पाणंद रस्ते, नाल्यांचे खोलीकरण, शुद्ध पाण्याचा पुरवठा, शहीद स्मारकाजवळील अपुरा रस्ता, खासदार निधीतून शाळांना संगणक, शौचालय, व्यायाम शाळेत सुसज्ज साधने याविषयी अडसूळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या योजनेअंतर्गत पाच वर्षांत पाचपेक्षा जास्त गावे आदर्श निर्माण करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आदर्श गाव योजनेचा आढावा घेण्यात येईल व कालबद्ध पण गतीमान असा हा कार्यक्रम राबविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.