शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

फवारणी प्रकरणातील 'ते' दोन शेतकरी कीटकनाशक विषबाधेचेच बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 4:47 PM

अमरावतीत कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेला.

अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेला. कृषी विभाग टाळाटाळ करीत होता; मात्र वैद्यकीय अहवालाअंती दोघांचाही मृत्यू कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेनेच झाला असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही प्रकरणात शासकीय मदतीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माहितीनुसार, यंदा जानेवारीपासून आतापर्यंत कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याचे १५३ रुग्ण दाखल झाले. यवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात ३५ शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रामुख्याने हा प्रश्न चर्चेत आला. शासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्यानंतर जिल्ह्यातदेखील अश्या घटनांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे एकाही शेतक-याचा मृत्यू झालेला नाही, यावर जिल्हा प्रशासन ठाम होते. मात्र, ७ आॅक्टोबरनंतर विविध रुग्णालयांकडून माहिती आल्यानंतर दोन महिन्यात दोन शेतक-यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने तत्त्वत: मान्य केली आहे.१ जानेवारी ते ७ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत १५३ विषबाधेचे रुग्ण दाखल झालेत व यापैकी दोन शेतक-यांचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी विभागाने सामान्य रुग्णालयाच्या हवाल्याने दिली. यामध्ये माहुली जहागीर ठाण्याच्या हद्दीतील डवरगाव येथे प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्याच्या हद्दीतील म्हैसपूर येथे किरण ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. यापैकी आवारे यांच्या नावाने सातबारा आहे, तर ठाकरे यांच्या वडिलांच्या नावाने जमीन आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून शासकीय मदत देण्यात येणार आहे.आॅक्टोबरमध्ये विषबाधेचे २९ रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयात १ आॅक्टोबरपासून कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधेतून २९ रुग्ण दाखल झालेत. १ जानेवारीपासून आतापर्यंत १५३ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालात नमूद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये किती रुग्णांनी विषबाधेचा उपचार घेतला, याची नेमकी माहिती शासकीय यंत्रणेजवळ नाही.ही आहेत विषबाधेची कारणेयंदा कपाशीची झालेली वाढ ही माणसांच्या उंचीपेक्षा अधिक असल्याने या पिकावर फवारणी करताना हवेची दिशा बदलल्यास फवारा थेट शेतकºयांच्या चेह-यावर उडतो आणि नाकातोंडातून विष थेट शरीरात जाते. बॅटरीमुळे गतीने चालणा-या चायना स्प्रे पंपाचा वापर, अप्रमाणित व अतिशय जहाल कीटकनाशकांची फवारणी, यंदा सप्टेंबरपासूनच कडक उन्हाचे चटके असल्याने शेतक-यांना आलेल्या घामामुळे त्वचेच्या छिद्रातून कीटकनाशकाचा अंश शरीरात भिनतो आदी कारणांमुळे शेतक-यांना कीटकनाशकांची विषबाधा होते.कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेमुळे दोन शेतक-यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालाने हे स्पष्ट केले आहे. शासकीय मदत मिळण्यासाठी दोन्ही प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहेत.अनिल खर्चान,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी