शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणच्या तुलनेत शहरात मतदान माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST

अमरावती : जिल्ह्याच्या तुलनेत ५० टक्क्यांवर मतदारसंख्या याशिवाय उमेदवारांची अधिक संख्या असलेले अमरावती शहर विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानात माघारले आहे. ...

अमरावती : जिल्ह्याच्या तुलनेत ५० टक्क्यांवर मतदारसंख्या याशिवाय उमेदवारांची अधिक संख्या असलेले अमरावती शहर विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदानात माघारले आहे. अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवरील घिसाड नियोजनाचा फटका मतदानाला बसला. रांगेत दोन ते तीन तास थांबल्यानंतरही प्रतीक्षा करावी लागत असल्याने काही मतदार मतदान न करताच घरी परतल्याचे वास्तव आहे.

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १०,३८६ मतदार व सर्वाधिक २५ मतदान केंद्र होते. त्यामुळे अमरावती शहरातील ९ व ग्रामीणमधील १ अशा एकूण १० मतदान केंद्रांवर सर्वधिक मतदान होईल, अशी अपेक्षा उमेदवारांची होती. मात्र, या १० केंद्रांवरील ५,४८३ मतदारसंख्येच्या तुलनेत ४,३०० मतदान झाले. सर्वात कमी ७१ व सर्वाधिक ८४ असे मतदान झाले आहे.

जिल्ह्यात धारणी तालुक्यात २५० मतदान झाले, ही टक्केवारी ८५.९१ इतकी आहे, चिखलदरा ८६ मतदान ८४.३१ टक्के, दर्यापूर ४६६ मतदान ८८.२६ टक्के, अंजनगाव सुर्जी ५०१ मतदान ९२.६१ टक्के, अचलपूर ९४३ मतदान ८४.२५, टक्के, चांदूर बाजार ३९२ मतदान ८९.७० टक्के, मोर्शी २७८ मतदान ८५.८० टक्के, वरूड ६५७ मतदान ९२.२४ टक्के, तिवसा ११८ मतदान ८५.७१ टक्के, नांदगाव खंडेश्वर १२३ मतदान ९१.११ टक्के, चांदूर रेल्वे १७८ मतदान ८९.४५ टक्के व दामणगाव तालुक्यात २७८ मतदान झाले, ही टक्केवारी ९२.०५ आहे.

बॉक्स

घिसाड नियोजन, मतदार परतले

शहरातील दोन केंद्रांवर अनुक्रमे ८५१ व ९३५ मतदारसंख्या होती. यावेळी प्रत्येक उमेदवारास तीन ते पाच मिनिटे वेळ मतदानास लागत असल्याने मतदानाची गती मंदावली, त्यातुलनेत मतदान करणाऱ्यांची संख्या वाढल्याने केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. दोन तासानंतरही प्रतीक्षा करावी लागत असल्याने काही मतदार दुपारनंतर मतदान करू, या उद्देशाने परतले. मात्र, परत आल्यानंतर यापेक्षाही बिकट स्थिती असल्याने काहींनी मतदान करायचे टाळले असल्याचे सांगण्यात आले.