शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रेल्वेच्या अंडरपास मार्गातून अवजड वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 1:12 AM

नरखेड-अमरावती रेल्वे मार्गावरील बेनोडा-लोणी रस्त्याने वाहतूक नियमित करण्यासाठी रेल्वेने बांधलेला भुयारी मार्गच या महत्त्वाच्या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

ठळक मुद्देसदोष बांधकाम : बेनोडा-लोणी भुयारी मार्ग

ऑनलाईन लोकमतबेनोडा : नरखेड-अमरावती रेल्वे मार्गावरील बेनोडा-लोणी रस्त्याने वाहतूक नियमित करण्यासाठी रेल्वेने बांधलेला भुयारी मार्गच या महत्त्वाच्या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.बेनोडा-लोणी मार्गाने लोणी परिसरातील सर्व गावांमध्ये एसटी बस फेऱ्या जातात. हा परिसर आणि आर्वी, आष्टी, पुलगाव, वर्धा येथून मोर्शी, चांदूरबाजार, परतवाडाकडे होणारी जड वाहतूक याच मार्गे होत असल्याने सतत वर्दळ असते. सोबतच मिझार्पूर येथील प्रसिद्ध गिट्टीखदानीतून गौणखनीज याच मार्गाने तालुक्यात पोहचविले जाते. या खदानीमुळे शासनाला कोट्यवधींचा महसूल प्राप्त होतो, हे विशेष.नवनिर्मित नरखेड-अमरावती रेल्वेमार्गावर बेनोड्यापासून काही अंतरावर रेल्वेफाटक आहे. रेल्वेमुळे रस्ता वाहतुकीत होणारा खोळंबा संपविण्यासाठी रेल्वेने मोठा खर्च करून भुयारी मार्ग बांधला. मात्र, बांधकाम करताना जड आणि अवजड वाहनांचा विचार झाला नसल्याचे स्पष्ट होते. या मागार्साठी आजूबाजूची थोडी जमीन अधिग्रहित करून दोन्ही बाजूची वळणे वाहतूक सुलभ करणे अपेक्षित होते. तसे न करता काटकोनात वळणमार्ग ठेवल्याने जड वाहनांना वळण घेता येत नाही. त्यामुळे एकाचवेळी दोन वाहने भुयारी मार्गावर समोरासमोर आल्यावर वाहतूक कोंडी निर्माण होते. बांधलेल्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे दोन्ही बाजूस साईडपट्या भरून त्यांची दबाई केली नसल्याची नागरिकांची ओरड आहे. या सदोष बांधकामामुळे बेनोडा -लोणी पारंपरिक रस्त्याचे भवितव्य धोक्यात असल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. भुयारी मार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरून विकासकामे जनहीतासाठी की विकासकांच्या उपजीविकेसाठी, हा प्रश्न निर्माण होतो. त्याची चौकशी करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अन्यथा रेल्वे प्रशासनाने जनतेच्या संतापाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नये, असा इशारा पंचायत समिती सदस्य, तुषार निकम यांनी दिला.