शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सुजल निर्मल योजनेचे तीन कोटी रूपये परत गेले

By admin | Updated: January 4, 2016 00:16 IST

अंजनगाव सुर्जी शहराची अपुरी पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सुजल निर्मल योजनेंतर्गत शासनाकडे प्रस्ताव पाठविला.

पाणीपुरवठा नूतनीकरण : तीन वर्षांपासून रखडला प्रस्तावअंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहराची अपुरी पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सुजल निर्मल योजनेंतर्गत शासनाकडे प्रस्ताव पाठविला. या प्रस्तावांतर्गत तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. पण या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्राप्त न झाल्याने हा निधी परत गेला. आता पुन्हा नव्याने ‘नगर उत्थान’ योजनेंतर्गत अधिकाऱ्यांनी पाईपलाईन दुरूस्ती व पाणी टाकी बांधकामाचा प्रस्ताव सादर केला आहे. सन २०१२ मध्ये पाठविलेल्या मूळ प्रस्तावाची तीन वर्षे निघून गेल्यामुळे व नव्या प्रस्तावाला पुन्हा वर्षभर वेळ लागणार असल्याने शहराची पाणी समस्या मिटण्याची नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. नव्या प्रस्तावांतर्गत अस्तित्वात असलेली पाईप लाईन बदलण्यासोबतच वाढीव आकाराच्या नव्या पाईप लाईन टाकण्याचा समावेश आहे. शहराची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी व जेथे पाणी मिळत नाही. त्या भागाला सुरळीत पाणी देण्यासाठी टाकरखेडा नाका परिसरात नवीन पाणी टाकी बांधणे व खोडगाव नाका परिसरात असलेली ३५ वर्षांपूर्वीची जुनी टाकी पाडून त्या जागी नवीन टाकी बांधणे या कामाचासुद्धा या प्रस्तावात समावेश आहे. सन १९७५ पासून सुरू झालेल्या नळ योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्याने व त्याची क्षमता अपुरी पडत असल्याने शहराला गतकाळात होणारा अविरत पाणीपुरवठा मर्यादित करण्यात आला असून सध्या दररोज दोन पाळ्यांमध्ये पाणी देण्यात येते. शहरात सध्या अंदाजे दहा हजार नळ ग्राहक आहेत. सार्वजनिक नळ योजना बंद झाल्यामुळेसुद्धा वैयक्तिक ग्राहक वाढले आहेत. नवीन प्रस्ताव पारित होईपर्यंत बुधवारच्या बंद पाणी पुरवठ्यासह उन्हाळ्यातील पाणी टंचाईलासुद्धा नळ ग्राहकांना सामोरे जावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)