शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

१२८ बदलीपात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होतील बदल्या; अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले एकाच जिल्ह्यात

By गणेश वासनिक | Published: April 21, 2024 1:14 PM

एकाच जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या; आरएफओंच्या मंत्रालयात येरझारा

अमरावती : राज्यातील बदली पात्र १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलींचे सूत्र मंत्रालयातून हलणार असल्याने अनेक वनाधिकारी मंत्रालयात फिल्डिंग लावताना दिसत आहे. एकाच वेळी होणाऱ्या राज्यस्तरीय बदल्याची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे ठाण मांडून बसलेल्यांना यावेळेस मात्र बाहेर पडावे लागेल, असे एकंदरीत चित्र आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकारी वनमंत्रालयाने स्वत:कडे घेतलेले आहेत. यामुळे मुख्य वनसंरक्षकांचे बदलींचे अधिकार संपुष्टात आले असून लागेबांधे ठेवत जिल्ह्यात राहणाऱ्या काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गोची झालेली आहे. शासन निर्णयानुसार यापुढे सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन्यजीव, कार्य आयोजना असा बदली प्रवास करावा लागेल. शिवाय तीन वर्षांच्यावर एकाच ठिकाणी थांबता येणार नाही, कारण आरएफओंचे पद हे राज्यस्तरीय असल्यामुळे बदल्यांचा निकष राज्यस्तरीय लावण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्हा बदल होणार आता या निर्णयावरून स्पष्ट झालेले आहेत. कारण महाराष्ट्रातील निवडणूक संपल्यानंतर प्रशासकीय धोरणात शिथिलता येऊन ३१ मे पर्यंत राज्यातील १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा पोळा फुटणार हे निश्चित झाले आहे.

मंत्रालयात जोरदार फिल्डिंग१२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली यादी १५ मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर अनेक वनाधिकारी मार्च एंडींगनंतर सक्रिय झालेले आहे. मंत्रालयात सध्या वनसचिव उत्तराखंडमध्ये प्रशिक्षणावर असून ते २९ एप्रिलपासून मंत्रालयात विराजमान होणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील काही आरएफओ आपापल्या परीने भेटीगाठी कोणी जागा मिळवायची ही सोय तयारी करण्याठी मंत्रालय गाठत आहेत. राज्यातील ७५ च्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी मंत्रालयाच्या पायरीचे दर्शन करून परतल्याची माहिती आहे.

एकाच जागी ठाण मांडून बसलेतगेल्या ४ वर्षांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या वनप्रशासनाकडे आलेल्या आहेत. मुख्य वनसंरक्षक दर्जाच्या वनाधिकाऱ्याशी लागेबांधे असणारे आरएफओ जिल्ह्यात अर्धी अधिक नोकरी करत आहेत. कधी सामाजिक वनीकरणनंतर प्रादेशिक असा बदली प्रवास सध्या सुरू आहेत. जिल्ह्यात राहण्याकरिता लक्ष्मी दर्शन दाखविण्याची प्रथा असल्याने १२८ च्या बदली यादीत १०० च्या जवळ वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग ३ प्रमाणे बदल्या करताना दिसून येतात. बनावट कारणे आणि लाखो रुपयांची उलाढाल यामुळे अनेकांना जिल्ह्यात राहतात येते अशी स्थिती आरएफओंच्या बदल्यांमध्ये यास आता मात्र ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Transferबदली