शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

खुपिया यंत्रणा आहे तरी कुठे, पोलिसांचा धाक संपला का? पालकमंत्र्यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:43 IST

Amravati : कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तासभर जंबो बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉटरीआड चालणारा ऑनलाइन जुगार, स्पाआड देहविक्री, एमडीची तस्करी, बनावट दारू यासह एरिया ९१ रेस्टो बारमध्ये फेक वेडिंगचा इव्हेंट होतो, अल्पवयीन मुले-मुली एकत्र येतात, धिंगाणा घातला जातो आणि तो थेट राज्याच्या विधिमंडळात गाजतो. मात्र, ही गंभीर बाब यंत्रणेला कळू नये, याबाबत आश्चर्य आहे. त्यामुळे खुपिया यंत्रणा आहे तरी कुठे, समाजात पोलिसांचा धाक संपला का? अशी विचारणा करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस प्रशासनाला खडेबोल सुनावले.

अमरावती शहरातील ढासळत चाललेल्या कायदा व सुव्यस्थेवर 'लोकमत'ने सातत्याने प्रशासनाने लक्ष वेधले होते. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १९ जुलै रोजी यंत्रणांचा आढावा घेतला, हे विशेष. तासभर चाललेल्या या बैठकीत बानवकुळे यांनी नागरिकांच्या तक्रारींना 'सिरीअस' घ्या. त्यांच्या प्रश्न, समस्या गांभीर्याने सोडवा, असे निर्देश देताना ना. बावनकुळे यांनी गोवंश तस्करीवर अंकुश लावणे, पोलिसांनी नागरिकांशी सुसंवाद ठेवणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे, मीडियासोबत संवाद वाढविणे आदी मुद्द्यांवर फोकस होता. विशेषतः वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आ. चंदू यावलकर, आ. प्रवीण तायडे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते. 

मोठ्या प्रमाणात एमडी तस्करीअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात एमडी तस्करी होत असताना त्याचे पाळेमुळे का नष्ट केले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जुगार, वरली मटका यासह अनेक अवैधधंदे सुरू असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होत असताना प्रशासनाने अॅक्शन घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. अलीकडे अमरावतीत खून होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून याकडे जातीने लक्ष द्यावे. कठोर कारवाई करा, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी पोलिस यंत्रणेला सांगितले. 

गुन्हेगारी थांबवा, वाळू तस्करी रोखाअमरावती हे सांस्कृतिक शहर आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये, असे सांगताना पालकमंत्री बावनकुळे यांनी ग्रामीण भागातील वाळू तस्करी थांबली पाहिजे, असा कानमंत्र दिला. गुन्हेगारी फोफावल्यास गाठ माझ्याशी आहे, असेही ते म्हणाले. पोलिसांनी नागरिकांमध्ये जाऊन सुसंवाद साधला. सोशल अॅक्टिव्हिटी वाढवा त्याद्वारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सहकार्य मिळेल, असा आशावाद बावनकुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAmravatiअमरावती