शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खुपिया यंत्रणा आहे तरी कुठे, पोलिसांचा धाक संपला का? पालकमंत्र्यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:43 IST

Amravati : कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तासभर जंबो बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉटरीआड चालणारा ऑनलाइन जुगार, स्पाआड देहविक्री, एमडीची तस्करी, बनावट दारू यासह एरिया ९१ रेस्टो बारमध्ये फेक वेडिंगचा इव्हेंट होतो, अल्पवयीन मुले-मुली एकत्र येतात, धिंगाणा घातला जातो आणि तो थेट राज्याच्या विधिमंडळात गाजतो. मात्र, ही गंभीर बाब यंत्रणेला कळू नये, याबाबत आश्चर्य आहे. त्यामुळे खुपिया यंत्रणा आहे तरी कुठे, समाजात पोलिसांचा धाक संपला का? अशी विचारणा करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस प्रशासनाला खडेबोल सुनावले.

अमरावती शहरातील ढासळत चाललेल्या कायदा व सुव्यस्थेवर 'लोकमत'ने सातत्याने प्रशासनाने लक्ष वेधले होते. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १९ जुलै रोजी यंत्रणांचा आढावा घेतला, हे विशेष. तासभर चाललेल्या या बैठकीत बानवकुळे यांनी नागरिकांच्या तक्रारींना 'सिरीअस' घ्या. त्यांच्या प्रश्न, समस्या गांभीर्याने सोडवा, असे निर्देश देताना ना. बावनकुळे यांनी गोवंश तस्करीवर अंकुश लावणे, पोलिसांनी नागरिकांशी सुसंवाद ठेवणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे, मीडियासोबत संवाद वाढविणे आदी मुद्द्यांवर फोकस होता. विशेषतः वाढत्या गुन्हेगारीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आ. चंदू यावलकर, आ. प्रवीण तायडे, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते. 

मोठ्या प्रमाणात एमडी तस्करीअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात एमडी तस्करी होत असताना त्याचे पाळेमुळे का नष्ट केले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जुगार, वरली मटका यासह अनेक अवैधधंदे सुरू असल्याच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होत असताना प्रशासनाने अॅक्शन घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. अलीकडे अमरावतीत खून होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून याकडे जातीने लक्ष द्यावे. कठोर कारवाई करा, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी पोलिस यंत्रणेला सांगितले. 

गुन्हेगारी थांबवा, वाळू तस्करी रोखाअमरावती हे सांस्कृतिक शहर आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये, असे सांगताना पालकमंत्री बावनकुळे यांनी ग्रामीण भागातील वाळू तस्करी थांबली पाहिजे, असा कानमंत्र दिला. गुन्हेगारी फोफावल्यास गाठ माझ्याशी आहे, असेही ते म्हणाले. पोलिसांनी नागरिकांमध्ये जाऊन सुसंवाद साधला. सोशल अॅक्टिव्हिटी वाढवा त्याद्वारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास सहकार्य मिळेल, असा आशावाद बावनकुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेAmravatiअमरावती