शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

तत्कालीन शिक्षणाधिकारी गेले राजकीय आश्रयाला; शिक्षक भरतीत झाली कोट्यवधींची आर्थिक उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:50 IST

Amravati : जिल्हा परिषदेत 'बॅक डेट' शिक्षक भरती घोटाळा; आमदार, खासदारांची चुप्पी का?, संशयकल्लोळात पडली भर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन २०१२ पासून भरती बंद असताना 'बैंक डेट'मध्ये शिक्षक भरती राबवून कोट्यवधींचा व्यवहार करण्यात आला आहे. तसेच अल्पसंख्याक शाळांचा दर्जा मान्यता यातही मोठा घोळ झाला आहे. यात तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मोठी माया जमविली असून, आता हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी त्या आमदार, खासदारांच्या घरी पायऱ्या झिजवत आहेत. तर दुसरीकडे शिक्षकी पेशाला लागलेल्या काळिमाची दखल न्यायपालिका सुमोटोच्या माध्यमातून अथवा स्वतः घेणार का? अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणारे तसेच टीईटीची व टेट पात्रता परीक्षा देऊन नियुक्तीची वाट पाहणारे लाखो विद्यार्थी करीत आहेत. 

शिक्षेसारख्या पवित्र मंदिराच्या ठिकाणी बोगस शिक्षकांच्या हाती आपल्या मुलाचे काय भवितव्य घडणार? यामुळे ग्रामीण पालक चिंतातुर आहेत. दुसरीकडे सरकारी नोकरी करत बहुतेकांनी आपल्या शिक्षण संस्था उघडल्या असून, आपल्या आप्त नातेवाइकांना मुख्याधापक बनवले आहे. २०१२ पासून शिक्षक भरती बंद होती. त्यादरम्यान जे लागले ते वेगळे, पण तीन वर्षापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती सुरू झाली. त्यानंतर ही भरती बंद झाली.

दरम्यान, याच काळात दलालांनी त्या आधीची नियुक्ती दाखवून मान्यतेचे बोगस प्रस्ताव दाखल करून घेण्यात आले. नियुक्ती जुनी असली तरी कोणाचा पगार या काळात सुरू झाला, त्यावरून हा घोटाळा सहज उघडकीस येऊ शकतो. याचा लेखाजोखा व अद्यावत सॉफ्टवेअर शिक्षण विभागाकडे आहे. त्याबरोबर अपर आयुक्त आदिवासी विभाग, नाशिक भरती जाहिरात २०१८ ही वादाच्या भोवऱ्यात घेण्यात आली होती. 

अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांची तक्रारराज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी हा घोटाळा उघड आणला. त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यात शिक्षकांसोबत शिक्षणाधिकारी, उपसंचालक सुद्धा दोषी आहेत, असे खान यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांनी शिक्षक भरतीकरिता बोगस डिग्री, मृत्यू प्रमाणपत्र, जियंत असताना अनुकंपा घोटाळा झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कोलकाता न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राला लागूशिक्षक भरती घोटाळ्यात ममता बॅनर्जी सरकारला सरकारी शाळांमधील २५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या डेस्कने कायम ठेवला. शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया योग्य नव्हती, असे म्हणत न्यायालयाने कडक टिप्पणी केली होती. त्यामुळे हाच निर्णय महाराष्ट्रात लागू पडत असल्याने शिक्षक वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे.

"आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, यांनी मागून एन्ट्री करायची."- प्रियांका चोपडे, स्पर्धा परीक्षा अभ्यासक

"भरती प्रकिया बंद असताना भरती होते, हे जगातील आठवे आश्चर्य आहे."- रितेश कोकाटे, टीईटी पात्रताधारक

"गोल्डन गैंग बेरोजगारी दूर करते, हे माहीत नव्हते. आम्ही त्यांचीच सेवा केली असती."- नकुल क्षीरसागर, टीईटी पात्रताधारक

"अलादीन का चिराग जवळ असताना मी ठेकेदार बनून २० टक्के वाटत फिरत होतो. आता २० लाख रुपये कर्ज करून ठेकेदार बनण्यापेक्षा मास्तर झालो असतो."-अजय देशमुख

टॅग्स :Amravatiअमरावती