शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन पथक, ‘टिस’चा अहवाल दडून, तरिही उच्चस्तरीय समिती?

By गणेश वासनिक | Updated: September 29, 2023 14:43 IST

राज्य शासनाने 'दोन्ही' अहवाल जाहीर करावे, ट्रायबल फोरमची मागणी

अमरावती : राज्य सरकारने धनगर आरक्षण प्रकरणी 'संशोधन पथक २००६ ' आणि 'टिस'चा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी ट्रायबल फोरम अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष रितेश परचाके यांनी केली आहे. या संदर्भात नुकतेच निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पाठविले आहे.

राज्यात धनगर समाजाला सध्या भटक्या विमुक्त समाजासाठी असलेल्या आरक्षणात स्वतंत्रपणे साडे तीन टक्के आरक्षण आहे. केंद्र सरकारमध्ये इतर मागासवर्गाचे (ओबीसी) आरक्षण आहे. आता पुन्हा राज्यात आदिवासी समाजाचे आरक्षण मिळावे, म्हणून अनुसूचित जमातीच्या यादीत 'धनगर' समाजाचा समावेश करण्याची मागणी होत आहे. ही पार्श्वभूमी लक्षात सरकारने धनगर संबंधी आधीचे 'दोन्ही' अहवाल जाहीर करावे. जनतेला अंधारात ठेवू नये.

राज्याच्या विधानपरिषदेच्या तत्कालीन सभापतीने १२ जुलै २००५ रोजी खास बैठक घेऊन धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश का करता येत नाही? या प्रश्नावर चर्चा केली होती. आणि खरचं धनगर अनुसूचित जमातीच्या सूचित आहेत का? हे संशोधन करण्यासाठी बिहार,ओरीसा व झारखंड या राज्यात एप्रिल २००६ मध्ये संशोधन पथक पाठवले होते. या संशोधन पथकाने १ जून २००६ रोजी सरकारला अहवाल सादर केला आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सन २०१५ दरम्यान देशातील नामांकित असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) मुंबई या संस्थेकडे 'धनगर' समाजाचा सखोल अभ्यास करण्याची जबाबदारी दिली होती.

राज्य शासनाकडे पाच वर्षांपासून अहवाल धुळखात

संशोधन पथक व ‘टिस’ या संस्थेने सखोल अभ्यास व संशोधन करुन २०१८ मध्ये राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. हे दोन्ही अहवाल शासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडून आहे. परंतू आजपर्यंत 'ते' अहवाल उघडे केले नाही आणि चर्चाही केली नाही. त्या अहवालात काय दडले आहे? हे मात्र राज्यातील जनतेला कळलेच नाहीत.

'संशोधन पथक २००६' आणि 'टिस' चा अहवाल उघडून जाहीर केलेला नाहीत. तरी पुन्हा नव्याने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेऊन ५० दिवसाचा अवधी दिलेला आहे. मताच्या राजकारणासाठी एवढी नैतिकता गमावणे, ही बाब दुर्दैवी आहे.

- रितेश परचाके, विभागीय अध्यक्ष, ट्रायबल फोरम अमरावती विभाग.

टॅग्स :reservationआरक्षणDhangar Reservationधनगर आरक्षणAmravatiअमरावती