शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर; अमरावतीत वर्षभरात २०१ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:19 IST

Amravati : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र अडीच दशकांत थांबलेले नाही, तर यामध्ये वाढ होत आहे. सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनस्तरावरून घेतली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र अडीच दशकांत थांबलेले नाही, तर यामध्ये वाढ होत आहे. सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद शासनस्तरावरून घेतली जाते. त्यानुसार जिल्ह्यात ५५७७ तर सन २०२५ मध्ये २०१ शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत. यामध्ये मे महिन्यात सर्वात कमी ९ तर मेमध्ये सर्वाधिक २७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.

राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाची सत्ता असली तरी शासन-प्रशासन शेतकरी आत्महत्या विषयात गंभीर नसल्याने शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. केवळ कर्जबाजारीपणामुळे नव्हे तर अन्य कारणांमुळेही शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहे. यापूर्वी महाडीबीटीमुळे गरजू शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी शासनाने राबविलेले प्रकल्प पांढरा हत्ती ठरले आहे. शेतकरी मिशनही विंवचनेतील शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलेला नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरूच असल्याचे वास्तव आहे.

केवळ सन २००१ पासून जिल्ह्यात ५,५७७ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहे. यामध्ये शासन मदतीसाठी २९४४ प्रकरणे पात्र ठरली आहेत तर २५६८ प्रकरणे अपात्र आहेत. २९२९ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय ६५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे.

विभागात ३६५ दिवसांत १०४० शेतकरी आत्महत्या

राज्यात वर्षभरात सर्वाधिक १०४० शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झालेल्या आहेत. दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहे. यामध्ये सर्वाधिक ३६४ शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या आहेत. किंबहुना राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या जिल्ह्यात झाल्या आहेत.

शेतकरी आत्महत्यांची कारणे

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, बँकांचे व खासगी सावकाराचे कर्ज, कर्जवसुलीस तगादा, मुलींचे लग्न, आजारपण आदी.

सन २०२० पासून आत्महत्या

  • सन २०२० - २९५
  • सन २०२१ - ३७०
  • सन २०२२ - ३४९
  • सन २०२३ - ३२६
  • सन २०२४ - २००
  • सन २०२५ - २०१

वर्षभरात फक्त ६० प्रकरणात शासन मदत

सन २०२५ मध्ये जिल्ह्यात २०१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये ७५ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली तर ६१ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. याशिवाय फक्त ६० प्रकरणांत शासन मदत देण्यात आलेली आहे. तर नऊ महिन्यांपासून ६५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे आता या प्रलंबीत प्रकरणाचा निपटारा केव्हा होणार हा खरा प्रश्न

English
हिंदी सारांश
Web Title : Disturbing Farmer Suicides Continue: 201 Deaths in Amravati This Year

Web Summary : Farmer suicides persist in Amravati, with 201 deaths recorded this year. Debt, crop failure, and lack of effective government aid contribute to the crisis. Amravati division saw 1040 suicides in a year, highlighting the severity.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र