शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापसावर तूर वरचढ, यंदा वाढणार पेरणीक्षेत्र, भावही १२ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 14:54 IST

Amravati : यंदा ७५५० रुपये एमएसपी उत्पादन खर्च कमी असल्यानेही कल

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : तुरीचा हमीभाव ७ हजार रुपये असताना वर्षभर १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. केंद्र शासनाने यंदा ५५० रुपयांनी वाढ केल्याने ७,५५० रुपये क्विंटल असा हमीभाव २०२४-२५ या वर्षात मिळणार आहे. त्या तुलनेत यंदा कापसाचा हमीभाव ७,५२१ रुपये आहे. तुरीचा उत्पादनखर्चही कमी असल्याने यंदा तुरीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

तुरीची पेरणी खरिपात होत असली तरी हंगाम मात्र रब्बीमध्ये होते. त्यामुळे तुरीचे आंतरपीक घेण्याकडे शेतकऱ्यांना कल असतो. दोन वर्षांपासून तुरीच्या सरासरी उत्पन्नात कमी आल्याने मागणी वाढून तुरीला उच्चांकी भाव मिळाला आहे. सध्या तूर १२ हजार रुपये क्विंटलप्रमाणे विकल्या जात आहे. सोयाबीन, कपाशीच्या तुलनेत तुरीला जास्त दर असल्याने यंदा तुरीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

यंदाच्या हंगामात तुरीचे १.१८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत किमान ३० हजार हेक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कपाशी हे जिल्ह्याचे 'कॅश क्रॅप' असले तरी उत्पादन खर्च जास्त, मजुरांच्या तुटवड्याने वेचणीचे दर जास्त शिवाय बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातुलनेत तुरीचा उत्पादन खर्च कमी असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे यंदा आंतरपीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती असल्याचे दिसून येते.

तुरीचे तालुकानिहाय सरासरी क्षेत्रअमरावती तालुक्यात ८११२ हेक्टर, भातकुली ६७५३, नांदगाव खंडेश्वर १००८५, तिवसा ६७८३, चांदूर रेल्वे ८१६२, धामणगाव रेल्वे ६९५४, मोर्शी ८९६१, वरुड १०९१५, चांदूरबाजार १०६५२, अचलपूर १०२३७, अंजनगाव सुर्जी ७६४७, दर्यापूर ९३५९, धारणी ८१४३ व चिखलदरा तालुक्यात ५२३७ हेक्टरमध्ये यंदा तुरीचे क्षेत्र प्रस्तावित आहे. यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

मजुरांचा तुटवडा, वेचणीची दरवाढ, बोंडअळीचे संकट, फवारणीचा खर्च यामुळे कपाशीचे नुकसान होते, खर्चही वाढतो, त्या तुलनेत भाव मिळत नाही. त्या तुलनेत तुरीचा उत्पादन खर्च कमी व भाव जास्त मिळत आहे. त्यामुळे यंदा तुरीचे तास वाढवित आहो.-रावसाहेब खंडारे, शेतकरी भातकुली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी