शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

'आळस काढणाऱ्या राजाचं राज्य टिकत नाही', बच्चू कडूंचा थेट उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 10:51 IST

आता कडू यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं आहे. 

अमरावती - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा अद्यापही मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, माजीमंत्री बच्चू कडू यांनी यापूर्वी आपली नाराजी जाहीरही केली होती. मात्र, सरकारने राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागास मंजुरी दिल्याने कडूंची नाराजी दूर झाल्याचे दिसून येते. त्यातच, त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आळस काढत असलेल्या राजाचं राज्य टिकत नाही, असे कडू यांनी म्हटले. 

बच्चू कडू माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांगासाठी मंत्रालय झाले, याचा आनंद आहे. यानिमित्ताने त्यांचे खूप अभिनंदन करतो. शेतकऱ्यांसाठी, अपंग बांधवांसाठी लढणारे नेते आहेत. उद्धव ठाकरेंचे त्यांच्यावर आणि त्यांचेही उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. ते ठाकरेंनाच साथ देतील, असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र, आता कडू यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं आहे. 

मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेले, वेळातच भेटायचं असं होता कामा नये. एक तर राजा व्हायचंच नाही झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राजाचं राज्य टिकत नाही, हे आपण दाखवून दिलं, असे आमदार बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले. जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगलं खातं मागत होते, सगळ्या गोष्टींनी वजनदार खातं मागण्याची रेस सुरू होती. पण, मी राज्यातील पहिला माणूस होतो की मी दिव्यांग मंत्रालय मागितलं, अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली. मात्र, कडू यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केल्यामुळे आता त्यांची नाराजी दूर झाल्याचीही चर्चा होत आहे.  

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूMLAआमदारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना