शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

संशय; ६० ते ७० जागांवरील आरक्षण बदलविले; पण कसे? आमदार धीरज लिंगाडे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 10:55 IST

Amravati : गौडबंगाल झाले कसे, केले कुणी!, प्रश्नांची मालिका, 'युडी'कडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त व एडीटीपींनी १ जानेवारी ते २९ जुलैपर्यंत अमरावती शहराच्या विकास योजनेतील (डीपी) ६० ते ७० आरक्षणे बदलविली, असा सनसनाटी आरोप अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केला आहे. आरक्षण काढण्याचा अधिकार हा केवळ मुख्यमंत्र्यांच्या व नगरविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याने ती आरक्षणे स्थानिक अधिकाऱ्यांनी कृषी क्षेत्रातून वगळून रहिवासी क्षेत्रामध्ये कसे बदलविले, त्यांना तो अधिकार आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहराची वाढती व्याप्ती व भविष्यातील नियोजनासाठी दर २० वर्षांनी विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) बनविला जातो. अमरावती महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने २९ जुलै २०२४ रोजी अमरावती शहराची प्रारूप विकास योजना मंजुरीसाठी शासनाकडे पाठविली आहे. त्यापूर्वी १ जानेवारी ते २९ जुलैपर्यंत त्यातील ६० ते ७० आरक्षणे बदलविल्याचा आरोप आ. लिंगाडे यांनी केला आहे.

अमरावती शहराची प्रारूप विकास योजना अद्यापही शासनस्तरावर मंजुरीकरिता विचाराधिन असताना तत्कालीन आयुक्त व नगररचना सहायक संचालकांनी त्यातून आरक्षण कसे वगळले असावे, याबाबत संशयकल्लोळ उठला आहे. नगरविकास विभागाच्या चौकशीत या प्रकरणाचे 'दूध का दूध' होणार आहे.

यापूर्वी देखील अमरावती शहराचा 'डीपी' हा बिल्डरधार्जिना असल्याचे आरोप झाले आहेत. तशा तक्रारी नगररचना विभागासह नगरविकास मंत्रालयाकडे करण्यात आल्या आहेत. अमरावती महानगरपालिकेने १९ नोव्हेंबर २०१९ रोजी पुणेस्थित नगररचना विभागाच्या यंत्रणेकडे नव्या विकास योजनेचे प्रारूप मंजुरीसाठी पाठविले होते. त्यावर नगररचना मी विभागाने नव्या व जुन्या प्रारूपात मोठी तफावत असल्याचे निरिक्षण नोंदविले होते. नियोजन समितीच्या रिपोर्टमधील मुद्दे गायब असण्यासह नव्या व जुन्या भूखंडाच्या वापरात करण्यात आलेले बदल, विकास योजनेत आरक्षणाकडे केलेले दुर्लक्ष, रहाटगावस्थित एका भूखंडांवरील प्राथमिक शाळा व हायस्कुलचे आरक्षण हटविण्यात आल्याचे निरिक्षण नगररचना विभागाने नोंदविले होते. दरम्यान जुन्या डीपीत ५१४ भूखंड आरक्षित होते. नव्या डीपीत ते २१० वर स्थिरावले आहे.

काय म्हणतो नियम?स्थानिक स्वराज्य संस्था शहर विकास व भविष्यकालीन योजनांसाठी खासगी मालकांच्या जागा आरक्षित करू शकते. दहा वर्षांच्या आत भूसंपादन करून संबंधिताला त्याचा मोबदला देणे अनिवार्य आहे. त्यानंतर जर स्थानिक स्वराज्य संस्थेने मोबदला दिला नाही, तर संबंधित मालक आपल्या भूखंडावरील आरक्षण हटवावे, यासाठी न्यायालयात जाऊ शकतो. किंवा मुख्यमंत्र्यांकडे अपील करू शकतो. असे असताना तत्कालीन आयुक्त व एडीटीपींनी थेट सीएमचे अधिकार वापरलेत का? यासह ६० ते ७० आरक्षण बदलविले असेल, तर त्यात भूसंपादन करून मोबदला न दिलेले भूखंड असावेत, अशी शक्यतादेखील वर्तविली जात आहे.

"स्थानिक स्वराज्य संस्थेने दहा वर्षांच्या आत आरक्षित केलेल्या जमिनीचे भूसंपादन करून संबंधित खासगी भूखंडधारकाच्या जमिनीचा मोबदला द्यायला हवा. अन्यथा संबंधित भूस्वामी आपल्या जागेवरील आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेतून किंवा मुख्यमंत्र्यांच्या दालनात दाद मागून काढू शकतो. अशा प्रकारे परस्पर आरक्षण काढता येत नाही."-प्रवीण पोटे-पाटील, माजी पालकमंत्री 

टॅग्स :AmravatiअमरावतीPravin Potte Patilप्रवीण पोटे पाटील