शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

धक्कादायक वास्तव : कर्जमाफीच्या वर्षपूर्तीमध्ये विदर्भात १,१९० शेतकरी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:01 IST

शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. या वर्षभराच्या कालावधीत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात १,१९० शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.

गजानन मोहोडअमरावती : बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्र्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. या वर्षभराच्या कालावधीत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात १,१९० शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा सहा महिन्यांत ४८६ शेतक-यांनी मृत्यूचा फास ओढल्याचे भीषण वास्तव आहे. 

शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात ३० जून २०१८ पावेतो १५ हजार १८७ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ८०२  प्रकरणे पात्र, ८ हजार २४३ अपात्र, तर २०० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा जानेवारीत ९७, फेब्रुवारी ८३, मार्च ९६, एप्रिल ८०, मे ७३ व जून महिण्यात ५७ शेतक-यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. विभागात दरदिवशी तीन कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. शेतकरी आत्मत्यप्रवण म्हणून ओळख असलेले अमरावती, यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात आत्महत्या कमी झाल्या असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. यंदाच्या सहा महिन्यांत १२६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली.

अपुरा पाऊस, बोंडअळीचा प्रकोप, सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज यासह अन्य कारणांमुळे शेतक-यांना नैराश्य येत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगाव कसे? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शकपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित लाभापासून राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच असल्याने शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. 

मृत्यनंतरही शेतकरी कुटुंबाची उपेक्षाचविभागात सन २००१ पासून १५,१८७ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्यात यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ८,२४३ प्रकरणांत शासकीय मदत नाकारण्यात आली. मृत्यूपश्चातही शासनाच्या अनास्थेने बळीराजाच्या पदरी उपेक्षाच आलेली आहे. दिड दशकातनंतरही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना फक्त एक लाखाची मदत मिळते. त्यातही ३० हजार बँक खात्यात, तर उर्वरित ७० हजार रुपये पाच वर्षांसाठी संयुक्त खात्यात ठेवी स्वरूपात राहते. त्यामुळे कुटुंबाचा कर्ता गमावल्यानंतर त्या परिवाराला विविध संकटांचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.