शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक वास्तव : कर्जमाफीच्या वर्षपूर्तीमध्ये विदर्भात १,१९० शेतकरी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 18:01 IST

शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. या वर्षभराच्या कालावधीत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात १,१९० शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.

गजानन मोहोडअमरावती : बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्र्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. या वर्षभराच्या कालावधीत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात १,१९० शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा सहा महिन्यांत ४८६ शेतक-यांनी मृत्यूचा फास ओढल्याचे भीषण वास्तव आहे. 

शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात ३० जून २०१८ पावेतो १५ हजार १८७ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ८०२  प्रकरणे पात्र, ८ हजार २४३ अपात्र, तर २०० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा जानेवारीत ९७, फेब्रुवारी ८३, मार्च ९६, एप्रिल ८०, मे ७३ व जून महिण्यात ५७ शेतक-यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. विभागात दरदिवशी तीन कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. शेतकरी आत्मत्यप्रवण म्हणून ओळख असलेले अमरावती, यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात आत्महत्या कमी झाल्या असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. यंदाच्या सहा महिन्यांत १२६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली.

अपुरा पाऊस, बोंडअळीचा प्रकोप, सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज यासह अन्य कारणांमुळे शेतक-यांना नैराश्य येत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगाव कसे? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शकपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित लाभापासून राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच असल्याने शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. 

मृत्यनंतरही शेतकरी कुटुंबाची उपेक्षाचविभागात सन २००१ पासून १५,१८७ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्यात यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ८,२४३ प्रकरणांत शासकीय मदत नाकारण्यात आली. मृत्यूपश्चातही शासनाच्या अनास्थेने बळीराजाच्या पदरी उपेक्षाच आलेली आहे. दिड दशकातनंतरही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना फक्त एक लाखाची मदत मिळते. त्यातही ३० हजार बँक खात्यात, तर उर्वरित ७० हजार रुपये पाच वर्षांसाठी संयुक्त खात्यात ठेवी स्वरूपात राहते. त्यामुळे कुटुंबाचा कर्ता गमावल्यानंतर त्या परिवाराला विविध संकटांचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.