शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवारात पेरण्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:13 IST

मृग कोरडा गेल्यानंतर उशिरा का होईना, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र, सर्वच तालुक्यात १०० मिमीच्या वर पाऊस झाल्याने शिवारात या दोन दिवसांत पेरणीची लगबग वाढली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : उशिरा पावसामुळे मूग, उडीद कमी, सोयाबीनची क्षेत्रवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मृग कोरडा गेल्यानंतर उशिरा का होईना, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र, सर्वच तालुक्यात १०० मिमीच्या वर पाऊस झाल्याने शिवारात या दोन दिवसांत पेरणीची लगबग वाढली आहे. सद्यस्थितीत दोन लाख हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या. ही टक्केवारी २७ आहे. यामध्ये सर्वाधिक ९६ हजार हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे.मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पिकांत फेरपालट होत असला तरी कपाशीचे क्षेत्र मात्र सध्या स्थिर राहणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७ लाख २८ हजार हेक्टरमध्ये पेरणीक्षेत्र राहणार आहे. यामध्ये मुगाचे ३३ हजार हेक्टर व उडिदाचे ३० हजार हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या वा तिसºया आठवड्यापर्यंत मूग, उडिदाची पेरणी केली जाते. यामुळे ६० दिवसाच्या अल्प कालावधीतील मूग व उडदाची पिकांचे क्षेत्र कमी होऊन ते सोयाबीनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असल्याचे कृषी विद्यापीठाने सांगीतले.जिल्ह्यात यंदा दोन लाख ९५ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित आहे. मध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, तर कपाशीचे १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाही. तूर्तास हेच क्षेत्र कायम राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.दोन लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीयंदाच्या हंगामासाठी ७.२८ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यापैकी २.३१ लाख हेक्टरमध्ये पेरणी आटोपली. यामध्ये सर्वाधिक ९६ हजार ३२४ हेक्टर क्षेत्र सोयाबीनचे आहे. कपाशी ५८ हजार ९१८, धान २ हजार ३८४, ज्वारी ४ हजार ५४९, मका ४ हजार ४०२, तूर ३२ हजार ४३४, मूग ३ हजार ५१५, उडीद ९९५, भुईमूग १६२ व इतर पिकांचे ५०२ हेक्टर क्षेत्र आहे.जिल्ह्यात सरासरी १५४ मिमी पाऊसजिल्ह्यात गुरुवारपर्यंत १३६ मिमी पाऊस अपेक्षित असताना १५४ मिमी पाऊस पडला. ही ११३ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच दिनांकाला ९०.२ मिमी पाऊस झाला. सद्यस्थितीत अमरावती १३७, भातकुली १३०, नांदगाव खंडेश्वर २१७, चांदूर रेल्वे १८८, धामणगाव रेल्वे १४१, तिवसा १०५, मोर्शी १३१, वरूड १२६, अचलपूर २१८, चांदूर बाजार १४८, दर्यापूर १५७, अंजनगाव सुर्जी १५८, धारणी १०५ व चिखलदरा तालुक्यात १९० मिमी पाऊस पडला. हा पाऊस पेरणीयोग्य असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस