शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

व्यक्तिमत्त्वातील सहजता हीच यशाची परिभाषा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:34 PM

गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.

ठळक मुद्देसुनील झोंबाडे : रतन टाटा रांगेत उभे असतात तेव्हा

अमरावती : गोड वाणी ओठांमधून प्रतिध्वनित होत असली तरी तिची निर्मिती आपुलकीच्या भावनेत होते. आपुलकीचा जन्म हा व्यक्तिमत्त्वातील सहजतेमुळे होतो, असे सूत्र सुनील झोंबाडे यांनी 'लोकमत'च्या वाचकांसाठी उलगडले.विदर्भाला पोल्ट्री क्षेत्र अपरिचित असताना, पहिला पोल्ट्री ब्रिडिंग फार्म अमरावतीत सुरू करण्याचे धाडस करून ती संकल्पना विदर्भाच्या मातीत रुजविणारे, पशुखाद्यनिर्माते आणि पंचतारांकित नांदगावपेठ एमआडीसी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील झोंबाडे सांगतात, सत्ता; पैसा; ताकद यामुळे जे साध्य होऊ शकत नाही, ते केवळ आपुलकीने संवाद साधल्यामुळे साध्य होते. गोड बोलण्याचे दोन प्रकार असतात. केवळ औपचारीकता नि सभ्यता म्हणून गोड बोलणे आणि मनापासून संवाद साधणे. दोन्ही प्रकार लाभप्रदच. परंतु, मला आकर्षित करतो तो दुसरा प्रकार. यशासोबत सहजता जपण्याचे कायम भान ठेवले की, इतरांप्रति आपुलकी बाळगणे सहजसाध्य असल्याचे नोंदवून विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या ओळींची ते आठवण करून देतात, ''जरी आले चंद्र सूर्य हाती, माणसाने विसरू नये पायाखालची माती''यशाच्या उत्तुंग शिखरावरही सहजतेने जगण्याचे अतुल्य उदाहरण सुनील झोंबाडे यांनी दिले. ते म्हणतात, मागच्या आठवड्यात मी दिल्ली विमानतळावर इकॉनॉमी श्रेणीच्या रांगेतील प्रक्रियेतून जात असताना बाजूच्या रांगेत चक्क रतन टाटा दिसले. विमान बाळगण्याच्या ऐपतीचा थोर उद्योजक इकॉनॉमी क्लासच्याच रांगेत उभा राहतो तीच सहजता, तेच यश...