शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साद्राबाडीत दहशत कायम रोजगारही हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:18 IST

साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.

ठळक मुद्देदोन आठवड्यानंतरही स्थिती जैसे थै : दिनचर्या विस्कळीत, संसार उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.साद्राबाडी, झिल्पी, गावलानडोह, पाथरपूर, सुसर्दा व राणीपिसा आदी गावांची दिनचर्याच या पंधरवड्यात बदलली. २१ आॅगस्टच्या मोठ्या धक्क्यानंतर गावातील अनेक घरांना तडे गेलेत. या ठिकाणी प्रशासन राहू देत नाही. तंबूत दिवस कसे काढावे, या विवंचनेत नागरिक आहेत. गावाला जो-तो भेट देत असल्याने जणू पर्यटनाचे स्वरूप आले. या प्रत्येकाशी बोलताना दहशतीत असलेला आदिवासी बांधव आणखीन भेदारला गेला. त्यांचे फोटोसेशन होत आहेत, तर पुढ कसं, या प्रश्नाने आदिवासींच्या जिवाची घालमेल होत आहे.मुलांच्या शाळा होत आहेत. पण शैक्षणिक भविष्य आहे काय? धक्क्यांनी मोठ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, तिथे चिमुकल्यांकडून अपेक्षा तरी किती करणार? गुरुजीच जीव मुठीत घेऊन शाळेत येतात. सुरुवातीला तर मुलेच शाळेत जायला धजावले नाहीत. पीएचसीच्या इमारतीला तडे गेल्याने उपचार तंबूत सुरू आहेत. साधारणपणे पाच हजार नागरिक बाधित आहेत. दोन हजारांवर गाव सोडून इतरत्र आश्रयाला गेले आहेत. अचानक कोणी आजारी पडले, तर १५-२० किमी अंतरावरील धारणीशिवाय पर्याय नाही. २०१३ मध्ये अशाच भूगर्भातील हालचाली झाल्यात. या पाच वर्षात या ठिकाणी काय सुविधा उभारल्या, याचे उत्तर आज प्रशासनाजवळ नाही. धक्क्यांची तिव्रता कमी होईल, अहवालही सादर होईल, पुन्हा कागदी घोडे नाचतील, त्यापुढे काय, याचे उत्तर प्रशासनाच द्यावे लागणार आहे.एमपीमधील पंधनामध्ये दशकापूर्वी हीच स्थितीसाद्राबाडीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील पंधना तालुक्यात १९९७-९८ मध्ये अशाच प्रकारे भूगर्भातून आवाज यायचे. यावेळीदेखील जीएसआयची चमू दाखल झाली होती. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हा प्रकार झाला होता. याची तीव्रता ही २ रिश्टर स्केलपर्यत होती. भूगर्भात पाणी झिरपल्यानेच वायूची हालचाल होऊन असे प्रकार होत असल्याचा निष्कर्ष निघाल्याचे जीएसआयच्या सूत्राने सांगितले.दोन्ही पथकांना माध्यमांशी बोलण्यास बंदीसाद्राबाडी येथे नागपूर येथील जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) तसेच दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ (एनसीएस) चमू दाखल आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास जिल्हा प्रशासनाने मनार्ई केल्याची माहिती जीएसआय पथकातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे साद्राबाडी येथे भूगर्भात नेमके काय सुरू आहे याची माहिती जिल्हा प्रशासन दडवित तर नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.साद्राबाडीत नागरिकांशी संवाद साधून शंकाचे निरसन करण्यात आले. येथे उपस्थित दोन्ही पथकांशी चर्चा केली. दिवसेंदिवस धक्क््यांची तीव्रता कमी होत आहे. उशिरापर्यंत अहवाल अपेक्षित आहे.- के. पी. परदेशीअपर जिल्हाधिकारीभूगर्भात झिरपलेल्या पाण्याने पोकळी भरत असल्याने ही हालचाल होत आहे. तीन यंत्रांच्या आठ दिवसांच्या नोंदींच्या अभ्यासानंतरचा निष्कर्ष व अहवाल डीएमकडे सादर करण्यात येईल.- मिलिंद धकातेसंचालक, भूकंपविज्ञान विभाग