शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

साद्राबाडीत दहशत कायम रोजगारही हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:18 IST

साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.

ठळक मुद्देदोन आठवड्यानंतरही स्थिती जैसे थै : दिनचर्या विस्कळीत, संसार उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.साद्राबाडी, झिल्पी, गावलानडोह, पाथरपूर, सुसर्दा व राणीपिसा आदी गावांची दिनचर्याच या पंधरवड्यात बदलली. २१ आॅगस्टच्या मोठ्या धक्क्यानंतर गावातील अनेक घरांना तडे गेलेत. या ठिकाणी प्रशासन राहू देत नाही. तंबूत दिवस कसे काढावे, या विवंचनेत नागरिक आहेत. गावाला जो-तो भेट देत असल्याने जणू पर्यटनाचे स्वरूप आले. या प्रत्येकाशी बोलताना दहशतीत असलेला आदिवासी बांधव आणखीन भेदारला गेला. त्यांचे फोटोसेशन होत आहेत, तर पुढ कसं, या प्रश्नाने आदिवासींच्या जिवाची घालमेल होत आहे.मुलांच्या शाळा होत आहेत. पण शैक्षणिक भविष्य आहे काय? धक्क्यांनी मोठ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, तिथे चिमुकल्यांकडून अपेक्षा तरी किती करणार? गुरुजीच जीव मुठीत घेऊन शाळेत येतात. सुरुवातीला तर मुलेच शाळेत जायला धजावले नाहीत. पीएचसीच्या इमारतीला तडे गेल्याने उपचार तंबूत सुरू आहेत. साधारणपणे पाच हजार नागरिक बाधित आहेत. दोन हजारांवर गाव सोडून इतरत्र आश्रयाला गेले आहेत. अचानक कोणी आजारी पडले, तर १५-२० किमी अंतरावरील धारणीशिवाय पर्याय नाही. २०१३ मध्ये अशाच भूगर्भातील हालचाली झाल्यात. या पाच वर्षात या ठिकाणी काय सुविधा उभारल्या, याचे उत्तर आज प्रशासनाजवळ नाही. धक्क्यांची तिव्रता कमी होईल, अहवालही सादर होईल, पुन्हा कागदी घोडे नाचतील, त्यापुढे काय, याचे उत्तर प्रशासनाच द्यावे लागणार आहे.एमपीमधील पंधनामध्ये दशकापूर्वी हीच स्थितीसाद्राबाडीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील पंधना तालुक्यात १९९७-९८ मध्ये अशाच प्रकारे भूगर्भातून आवाज यायचे. यावेळीदेखील जीएसआयची चमू दाखल झाली होती. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हा प्रकार झाला होता. याची तीव्रता ही २ रिश्टर स्केलपर्यत होती. भूगर्भात पाणी झिरपल्यानेच वायूची हालचाल होऊन असे प्रकार होत असल्याचा निष्कर्ष निघाल्याचे जीएसआयच्या सूत्राने सांगितले.दोन्ही पथकांना माध्यमांशी बोलण्यास बंदीसाद्राबाडी येथे नागपूर येथील जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) तसेच दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ (एनसीएस) चमू दाखल आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास जिल्हा प्रशासनाने मनार्ई केल्याची माहिती जीएसआय पथकातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे साद्राबाडी येथे भूगर्भात नेमके काय सुरू आहे याची माहिती जिल्हा प्रशासन दडवित तर नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.साद्राबाडीत नागरिकांशी संवाद साधून शंकाचे निरसन करण्यात आले. येथे उपस्थित दोन्ही पथकांशी चर्चा केली. दिवसेंदिवस धक्क््यांची तीव्रता कमी होत आहे. उशिरापर्यंत अहवाल अपेक्षित आहे.- के. पी. परदेशीअपर जिल्हाधिकारीभूगर्भात झिरपलेल्या पाण्याने पोकळी भरत असल्याने ही हालचाल होत आहे. तीन यंत्रांच्या आठ दिवसांच्या नोंदींच्या अभ्यासानंतरचा निष्कर्ष व अहवाल डीएमकडे सादर करण्यात येईल.- मिलिंद धकातेसंचालक, भूकंपविज्ञान विभाग