शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साद्राबाडीत दहशत कायम रोजगारही हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:18 IST

साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.

ठळक मुद्देदोन आठवड्यानंतरही स्थिती जैसे थै : दिनचर्या विस्कळीत, संसार उघड्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर आहे. जिल्हा प्रशासनाद्वारा केवळ धीर दिला जात आहे. याने पोट भरेल काय, हा आदिवासी बांधवांचा सवाल आहे.साद्राबाडी, झिल्पी, गावलानडोह, पाथरपूर, सुसर्दा व राणीपिसा आदी गावांची दिनचर्याच या पंधरवड्यात बदलली. २१ आॅगस्टच्या मोठ्या धक्क्यानंतर गावातील अनेक घरांना तडे गेलेत. या ठिकाणी प्रशासन राहू देत नाही. तंबूत दिवस कसे काढावे, या विवंचनेत नागरिक आहेत. गावाला जो-तो भेट देत असल्याने जणू पर्यटनाचे स्वरूप आले. या प्रत्येकाशी बोलताना दहशतीत असलेला आदिवासी बांधव आणखीन भेदारला गेला. त्यांचे फोटोसेशन होत आहेत, तर पुढ कसं, या प्रश्नाने आदिवासींच्या जिवाची घालमेल होत आहे.मुलांच्या शाळा होत आहेत. पण शैक्षणिक भविष्य आहे काय? धक्क्यांनी मोठ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, तिथे चिमुकल्यांकडून अपेक्षा तरी किती करणार? गुरुजीच जीव मुठीत घेऊन शाळेत येतात. सुरुवातीला तर मुलेच शाळेत जायला धजावले नाहीत. पीएचसीच्या इमारतीला तडे गेल्याने उपचार तंबूत सुरू आहेत. साधारणपणे पाच हजार नागरिक बाधित आहेत. दोन हजारांवर गाव सोडून इतरत्र आश्रयाला गेले आहेत. अचानक कोणी आजारी पडले, तर १५-२० किमी अंतरावरील धारणीशिवाय पर्याय नाही. २०१३ मध्ये अशाच भूगर्भातील हालचाली झाल्यात. या पाच वर्षात या ठिकाणी काय सुविधा उभारल्या, याचे उत्तर आज प्रशासनाजवळ नाही. धक्क्यांची तिव्रता कमी होईल, अहवालही सादर होईल, पुन्हा कागदी घोडे नाचतील, त्यापुढे काय, याचे उत्तर प्रशासनाच द्यावे लागणार आहे.एमपीमधील पंधनामध्ये दशकापूर्वी हीच स्थितीसाद्राबाडीपासून २५ किमी अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील पंधना तालुक्यात १९९७-९८ मध्ये अशाच प्रकारे भूगर्भातून आवाज यायचे. यावेळीदेखील जीएसआयची चमू दाखल झाली होती. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हा प्रकार झाला होता. याची तीव्रता ही २ रिश्टर स्केलपर्यत होती. भूगर्भात पाणी झिरपल्यानेच वायूची हालचाल होऊन असे प्रकार होत असल्याचा निष्कर्ष निघाल्याचे जीएसआयच्या सूत्राने सांगितले.दोन्ही पथकांना माध्यमांशी बोलण्यास बंदीसाद्राबाडी येथे नागपूर येथील जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया (जीएसआय) तसेच दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ (एनसीएस) चमू दाखल आहेत. माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास जिल्हा प्रशासनाने मनार्ई केल्याची माहिती जीएसआय पथकातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे साद्राबाडी येथे भूगर्भात नेमके काय सुरू आहे याची माहिती जिल्हा प्रशासन दडवित तर नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.साद्राबाडीत नागरिकांशी संवाद साधून शंकाचे निरसन करण्यात आले. येथे उपस्थित दोन्ही पथकांशी चर्चा केली. दिवसेंदिवस धक्क््यांची तीव्रता कमी होत आहे. उशिरापर्यंत अहवाल अपेक्षित आहे.- के. पी. परदेशीअपर जिल्हाधिकारीभूगर्भात झिरपलेल्या पाण्याने पोकळी भरत असल्याने ही हालचाल होत आहे. तीन यंत्रांच्या आठ दिवसांच्या नोंदींच्या अभ्यासानंतरचा निष्कर्ष व अहवाल डीएमकडे सादर करण्यात येईल.- मिलिंद धकातेसंचालक, भूकंपविज्ञान विभाग