शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

ग्रामीण भागात ६६ दिवसांत कोरोनाने दगावले ३५५ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दुसऱ्यांदा सुरू झाला त्या मार्च, एप्रिल ते ५ मे या ६६ दिवसांच्या कालावधीत ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दुसऱ्यांदा सुरू झाला त्या मार्च, एप्रिल ते ५ मे या ६६ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३५५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू ६० वर्षांवरील वृद्धांचे आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९१, तर एप्रिल महिन्यात १७९ व १ ते ५ मे या दरम्यान ८५ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाने गतवर्षी मार्च, एप्रिलमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर बरीच आकडा वाढतच गेला. जुलै महिन्यात दोन ते चारच्या घरात जाणारे बळी सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात वाढले होते. कोरोनाच्या या लाटेत सर्वात जास्त फटका बसला तो वृद्ध व्यक्तींना. पहिल्या लाटेत तरुणाई कोरोनापासून लांब होती. एखाद्या तरुणाचाच मृत्यू झाल्याचे पुढे येत होते. मात्र, एप्रिल महिन्यात आलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेचा विळखा तरुणांनी भोवती घट्ट होत चालला आहे. ३० ते ५० वयोगटाच्या बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनची शक्यता यामुळे सध्याची परिस्थिती अधिक धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.

कोरोनापासून संरक्षणाच्या त्रिसूत्रीचे पालन न केल्यास कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची धोका आणखी वाढला आहे. गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ५५२ मृत्यू झाले आहेत. यामध्ये ७० टक्के पुरुष व ३० टक्के महिला आहेत. मार्च ते ५ मे पर्यंत ३१ ते ४० वर्षे वयोगटातील ३० जणांचा मृत्यू झाला.

बॉक्स

असे आहेत वयोगटानुसार मृत्यू

० ते ३० वर्ष- ११

३१ ते ४० वर्ष-३०

४१ ते ५० वर्ष -५१

५१ ते ६० वर्ष -७१

६० वर्षांवरील - १९२

एकूण - ३५५