शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

ग्रामीण भागात ६६ दिवसांत कोरोनाने दगावले ३५५ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दुसऱ्यांदा सुरू झाला त्या मार्च, एप्रिल ते ५ मे या ६६ दिवसांच्या कालावधीत ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप दुसऱ्यांदा सुरू झाला त्या मार्च, एप्रिल ते ५ मे या ६६ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३५५ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू ६० वर्षांवरील वृद्धांचे आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९१, तर एप्रिल महिन्यात १७९ व १ ते ५ मे या दरम्यान ८५ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाने गतवर्षी मार्च, एप्रिलमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर बरीच आकडा वाढतच गेला. जुलै महिन्यात दोन ते चारच्या घरात जाणारे बळी सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात वाढले होते. कोरोनाच्या या लाटेत सर्वात जास्त फटका बसला तो वृद्ध व्यक्तींना. पहिल्या लाटेत तरुणाई कोरोनापासून लांब होती. एखाद्या तरुणाचाच मृत्यू झाल्याचे पुढे येत होते. मात्र, एप्रिल महिन्यात आलेल्या दुसऱ्या कोरोना लाटेचा विळखा तरुणांनी भोवती घट्ट होत चालला आहे. ३० ते ५० वयोगटाच्या बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनची शक्यता यामुळे सध्याची परिस्थिती अधिक धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.

कोरोनापासून संरक्षणाच्या त्रिसूत्रीचे पालन न केल्यास कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची धोका आणखी वाढला आहे. गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा संसर्ग झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ५५२ मृत्यू झाले आहेत. यामध्ये ७० टक्के पुरुष व ३० टक्के महिला आहेत. मार्च ते ५ मे पर्यंत ३१ ते ४० वर्षे वयोगटातील ३० जणांचा मृत्यू झाला.

बॉक्स

असे आहेत वयोगटानुसार मृत्यू

० ते ३० वर्ष- ११

३१ ते ४० वर्ष-३०

४१ ते ५० वर्ष -५१

५१ ते ६० वर्ष -७१

६० वर्षांवरील - १९२

एकूण - ३५५