शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

‘मुंबई रिटर्न’ भिक्षुकांपासून कोरोना संक्रमणाचा धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 5:00 AM

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे.

ठळक मुद्देप्रशासन अनभिज्ञ, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता ?

 गणेश वासनिक    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या रोडावली असली तरी मुंबईहून परत पाठविलेल्या भिक्षुकांपासून शहरवासीयांना कोविड-१९चा धोका वाढला आहे. मुंबईहून आलेल्या या भिक्षुकांच्या माध्यमातून शहरात कोरानाची दुसरी लाटही पसरू शकते, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे मुंबईत भीक मागून उपजिविका चालविणारे बहुतांश पारधी समाजातील महिला, पुरुष हे कुटुंबीयांसह अमरावतीत दाखल झाले आहेत. यात काही नजीकच्या गाव-खेड्यांतील व्यक्तींचासुद्धा समावेश आहे. चार ते पाच महिन्यांपासून मुंबईहून परतलेल्या भिक्षुकांनी अमरावतीत महत्त्वाच्या चाैकात ठिय्या मांडला आहे. यात राजकमल चौक, श्याम चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, रेल्वे स्टेशन चौक, बसस्थानक परिसराचा समावेश आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री शहरात चौकाचौकांत सिंग्नलवरील भिक्षुकांचे  ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवून त्यांना घरी पाठविले. तरीही गुरुवारी स्थानिक गर्ल्स हायस्कूल चौकात दुपारी १२ ते १ वाजताच्या सुमारास मुले, महिला व बालके  भीक मागताना दिसून आले.  काही मुले अपूर्ण कपड्यांत होती.  तोंडाला मास्क नाही. सिग्नलवर वाहन थांबताच वाहनचालकांना पैशाची मागणी ते करतात. खुल्या आकाशाखाली उघड्यावर जगणे हाच त्यांचा शिरस्ता आहे. दुकाने, प्रतिष्ठानांमध्ये दररोज भीक मागणाऱ्यांची संख्या २२५ च्या घरात  आहे. मुंबइईहून शहरात दाखल झालेल्यांची संख्या २०० च्या घरात आहे. चार-साडेचारशे भिक्षुक सतत वाहनचालकांच्या संपकार्त येत असल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

कोरोना म्हणजे काय?मुंबई बंद होणार म्हणून तेथून हाकलले. एप्रिलपासून मूळ गावी पाेहोचलो. गावात उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे भीक मागून चार महिन्यांपासून अमरावतीत जगत आहे. कोरोना, मास्क काय आहे, हे माहिती नसल्याचे एकाने सांगितले. 

रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देणार कोण?रस्त्यावरील भिक्षुकांना पोट भरण्याची चिंता आहे. मिळेल ते खाणे आणि उघड्यावर जगणे, अशी त्यांची जीवनशैली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत आहे. त्यामुळे सामाजिक स्ंघटना अथवा कार्यकर्त्यांनी  रस्त्यावरील भिक्षुकांना मास्क देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सिग्नलवर भिक्षुकांची गर्दी ही बाब अशोभनीय आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ठाणेनिहाय बाहेरगावच्या भिक्षुकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचे नियोजन आखले आहे. बुधवारपासून कार्यवाही सुरू झाली आहे. दिवाळीपूर्वीच भिक्षुकांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घराकडे पाठविले जाणार आहे.- अशोक लांडे,  वाहतूक पोलीस निरीक्षक, पूर्व विभाग.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या