शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

अमरावती जिल्ह्यात बोंड अळीच्या तक्रारींचा वाढता ओघ, नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 17:24 IST

जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त आहेत. 

- वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त आहेत. जिल्ह्यात यंदा २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. उशिरा व अनियमित पावसामुळे बहुतांश शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. हिमतीने पिके जोपासल्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाच्या पाहणीत पिकांवर ९६ टक्क््यांपर्यंत बोंडअळी असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान शेतक-यांनी बोंडअळीसंदर्भात तक्रारी करण्यास सुरुवात केली. मागील दोन दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांनी बीटी बियाण्यासंदर्भात दीड हजारांहून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असून, ५४५ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात, तर वरूड तालुक्यात सर्वांत कमी दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व भातकुली तालुक्यात बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात एकही तक्रार नाही. मात्र, चिखलदरा तालुक्यात ४३२ हेक्टरवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी अधिका-यांनी सांगितले. बीटी कंपन्यांची तपासणी करागत दोन वर्षांच्या तुलनेत कपाशीचा पेरा यंदा जादा झाल्याने शिल्लक असलेले बियाणे कंपन्यांनी विक्रीस काढले. बीटी बियाणे कंपन्यांच्या प्रयोगशाळांची तपासणी करावी. बियाणे विक्रीचा रेकार्ड तपासावा, रॉयल्टीविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  उभ्या पिकात फिरविला नांगर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी उभ्या पिकात नांगर फिरविला. उत्पादन होणार नसेल तर काय उपयोग, असे म्हणत शेकडो शेतक-यांनी रबी पिकासाठी जमीन मोकळी केली. कपाशीची मोड करायच्या विचाराने दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर येथील भानुदास देशमुख या शेतकºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. 

बोंडअळी बाधित शेतक-यांना खरोखरच मदत करायची असेल, तर महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून सरसकट मदत जाहीर करावी. केवळ तक्रारी जमा करून काहीच होणार नाही. - जगदीशनाना बोंडे,शेतकरी नेते, अमरावती 

तालुकानिहाय तक्रारी तालुका     तक्रारी अचलपूर     ३३अंजनगाव सुर्जी     २६३भातकुली     २९०चांदूर रेल्वे     २५५चांदूर बाजार     १४४धामणगाव रेल्वे     २७२दर्यापूर         १७३नांदगाव खंडेश्वर     ५४५मोर्शी         ४३तिवसा        १८वरूड         ०२

टॅग्स :Amravatiअमरावती