शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
3
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
4
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
5
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
6
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
7
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
8
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
9
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
10
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
12
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
13
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
14
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
15
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
16
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
17
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
18
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
19
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन

अमरावती जिल्ह्यात बोंड अळीच्या तक्रारींचा वाढता ओघ, नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 17:24 IST

जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त आहेत. 

- वीरेंद्रकुमार जोगी अमरावती : जिल्ह्यात कपाशीचा पेरा वाढला असतानाच यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटीवर बोंडअळी येत नसल्याचा दावा फोल ठरल्याने बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतक-यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे सुरू केले असून, मागील दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार ५०० हून अधिक तक्रारी प्राप्त आहेत. जिल्ह्यात यंदा २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. उशिरा व अनियमित पावसामुळे बहुतांश शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. हिमतीने पिके जोपासल्यावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाच्या पाहणीत पिकांवर ९६ टक्क््यांपर्यंत बोंडअळी असल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान शेतक-यांनी बोंडअळीसंदर्भात तक्रारी करण्यास सुरुवात केली. मागील दोन दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांनी बीटी बियाण्यासंदर्भात दीड हजारांहून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील असून, ५४५ तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यात, तर वरूड तालुक्यात सर्वांत कमी दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व भातकुली तालुक्यात बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात एकही तक्रार नाही. मात्र, चिखलदरा तालुक्यात ४३२ हेक्टरवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी अधिका-यांनी सांगितले. बीटी कंपन्यांची तपासणी करागत दोन वर्षांच्या तुलनेत कपाशीचा पेरा यंदा जादा झाल्याने शिल्लक असलेले बियाणे कंपन्यांनी विक्रीस काढले. बीटी बियाणे कंपन्यांच्या प्रयोगशाळांची तपासणी करावी. बियाणे विक्रीचा रेकार्ड तपासावा, रॉयल्टीविषयी माहिती घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  उभ्या पिकात फिरविला नांगर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी उभ्या पिकात नांगर फिरविला. उत्पादन होणार नसेल तर काय उपयोग, असे म्हणत शेकडो शेतक-यांनी रबी पिकासाठी जमीन मोकळी केली. कपाशीची मोड करायच्या विचाराने दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर येथील भानुदास देशमुख या शेतकºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. 

बोंडअळी बाधित शेतक-यांना खरोखरच मदत करायची असेल, तर महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करून सरसकट मदत जाहीर करावी. केवळ तक्रारी जमा करून काहीच होणार नाही. - जगदीशनाना बोंडे,शेतकरी नेते, अमरावती 

तालुकानिहाय तक्रारी तालुका     तक्रारी अचलपूर     ३३अंजनगाव सुर्जी     २६३भातकुली     २९०चांदूर रेल्वे     २५५चांदूर बाजार     १४४धामणगाव रेल्वे     २७२दर्यापूर         १७३नांदगाव खंडेश्वर     ५४५मोर्शी         ४३तिवसा        १८वरूड         ०२

टॅग्स :Amravatiअमरावती