शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

रेती तस्करी उघड केल्याचा सूड ; ढाब्यासह वाहनं, रोकड केली खाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:02 IST

"श्रीकांत जयस्वाल यांचा ढाबा जाळला : अडीच लाखांची रोकडही जळाली!

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : पोलिसांना ढाब्यात बसवून का ठेवता, तुमच्यामुळे आमचे धंदे खराब झाले आहेत, असे म्हणत अख्खा ढाबा २० लिटर पेट्रोल ओतून जाळून टाकल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या जाळपोळीमध्ये ढाबा संचालकाच्या मालकीची कार, दुचाकी, सायकल, अडीच लाख रुपये रोख तसेच संपूर्ण साहित्याची राखरांगोळी झाली. एकूण २५ लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार धारणी पोलिस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक जाधव, पोलिस उपनिरीक्षक सतीश झालटे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

धारणीपासून १८ किलोमीटर अंतरावरील बिजूधावडी ते ढाकणा मार्गालगत श्रीकांत लालबहादूर जयस्वाल (३८) यांच्या ढाब्याची जाळपोळ करण्यात आली. श्रीकांत जयस्वाल हे पत्नी, मुलगा आणि मुलीसमवेत येथेच वास्तव्याला होते. पोलिसांना रेती तस्करीची माहिती देत असल्याचा आरोप सोमवारी रात्री ढाब्यात शिरलेल्या लगतच्या गडगामालूर या गावातील पाच इसमांनी केला. श्रीकांत व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. सोबत आणलेल्या कॅनमधील २० लिटर पेट्रोल ढाबा परिसरात ओतून आग लावण्यात आली. श्रीकांत यांनी मुलगा प्रिन्स (१०) याला मोठ्या मुश्किलीने आरोपींच्या तावडीतून सोडवून बाहेर काढले आणि कसेबसे पोलिस ठाणे गाठले. आगीत ढाबा जळून खाक झाला. पुढ्यात असलेली कार आणि दुचाकीही जळाली. पाणी प्यायला ग्लासदेखील शिल्लक राहिलेला नाही.

पोलिसांनाही शिवीगाळ, पलायन...जाळपोळीपूर्वी दोन पोलिस कर्मचारी सामिष भोजनाकरिता आले होते. त्यांनी जेवण सुरू होण्यापूर्वीच जाळपोळ करण्यात आली. आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केल्याची माहिती आहे. आरोपी तुल्यबळ ठरल्याने दोन्ही पोलिसांनी घटनास्थळाहून पळ काढल्याचे ढाबा संचालक श्रीकांत जयस्वाल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

रोकडने घेतला पेट....ढाब्यामध्ये रोख रकमेसाठी ठेवण्यात आलेल्या दोन पेट्यांमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल होते. त्या संपूर्ण नोटा जळून खाक झाल्या. एकूण अडीच लाख रुपयांची ही रक्कम होती, असे तक्रारीत नमूद आहे.

चौघांना अटक...गजानन ऊर्फ दिलीप बाबू पाटील खडके (३३), राजा ऊर्फ कृष्णा बाबू पाटील खडके (२९), गणेश ऊर्फ बाला बाबू पाटील खडके (२८) व उत्तम बलदेव पाटील खडके (२५) या चौघांना प्रकरणात अटक करण्यात आली आहे, तर पवन पाटील खडके नामक आरोपी पसार झाला आहे. यापैकी राजा ऊर्फ कृष्णच्हा पश्चिम बंगाल राज्यात रेल्वे पोलिसात कार्यरत असून तो मुख्य सूत्रधार असल्याची माहिती ठाणेदारांनी दिली. मारहाण, खुनाचा प्रयत्न तसेच आर्म्स अॅक्ट अन्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावतीsandवाळूmafiaमाफिया