शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांचे पुनर्वसन, अन्न सुरक्षेचा लाभ द्या

By admin | Updated: August 1, 2014 00:04 IST

तालुक्यात २७ जुलै रोजी झालेल्या पूर्णेच्या महाप्रलयकारी पुरामुळे नदीकाठच्या २० वर गावांतील हजारो कुटुंबांना झळ पोहोचली. त्यांच्या घरांची पडझड झाली असून शेकडो कुटुंब बेघर झाले आहे.

भाजपाची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदनचांदूरबाजार : तालुक्यात २७ जुलै रोजी झालेल्या पूर्णेच्या महाप्रलयकारी पुरामुळे नदीकाठच्या २० वर गावांतील हजारो कुटुंबांना झळ पोहोचली. त्यांच्या घरांची पडझड झाली असून शेकडो कुटुंब बेघर झाले आहे. यात शेतीचेही नुकसान झाले. त्यांना त्वरित मदत देऊन घर गमावलेल्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तालुका भाजपाने जि. प. सदस्य व आरोग्य सभापती मनोहर सुने, तालुका भाजपाध्यक्ष रवी पवार, अशोकराव बनसोड, प्रमोद कोरडे, बाळासाहेब अलोने यांचे नेतृत्वात दिलेल्या निवेदनानुसार २७ जुलै रोजी पूर्णा धरणाचे सर्व ९ दरवाजे एकदम उघडल्यामुळे पूर्णा नदीने विक्राळ रूप धारण केले. प्रशासनाची मदत येण्याअगोदरच नदीकाठच्या ब्राम्हणवाडा (थडी), देऊरवाडा, काजळी, थुगाव, पिंप्री, निंभोरा, हिरूळ पूर्णा, कुरळपूर्णा, तुळजापूर गढी, टाकरखेडा, आसेगाव, राजना आदी गावात पूर्णेचे पाणी शिरले तर शिरजगाव बंड, आखतवाडा, खरवाडी, खराळा, प्रल्हादपूर, जैनपूर, जवळा, माधान, घाटलाडकी, सोनोरी, नानोरी आदी गावातील शेती खरडून गेली. चिंचोली, बेलोरा, राजुरा, वाठोडा आदी गावांतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात घरामधील धान्य पाण्यामुळे पूर्णत: नष्ट झाले. या पुराने अनेक गावांत घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली. या समस्यांची गंभीर दखल घेऊन शासनाने याची सोडवणूक त्वरित करावी, आपदग्रस्तांना त्वरीत आर्थिक मदत करून नदीकाठावरील व नाल्याकाठावरील कुटुंबाचे त्वरीत पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आली असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी नंदकिशोर मडघे, टिंकू अहिर, दिवाकर तायवाडे, प्रकाश झोलेकर, दिवाकर तायवाडे, जगदीश तायवाडे, राजेश जावरकर, किशोर मेटे, प्रमोद मडघे, कमल माहोरे, सुनील पवार, जयकिसन भुजाडे, अरूण पाथरकर, अमोल ठाकूर, राजाभाऊ ढवळे, अतुल दारोकार, मनोज ठाकूर, रामू गावंडे, नितीन अलोणे, बाबू सहारे, कृणाल सोळंके, सचिन अग्रवाल, आनंद खांडेकर, पांडुरंग भागवत, सागर घोंगडे, गोपी राठोड, रावसाहेब घुलक्षे, शाम रामेकर, पंकज देशमुख, मुरली माकोडेंसह कार्यकर्ते उपस्थित होते.