शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

शहरात लवकरच नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:33 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन : शहर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी गुरूवार २८ सप्टेंबर रोजी शहर काँग्रेसअध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्राधिकरण कार्यालवर धडक दिली.यावेळी मजीप्राचे अधीक्षक अभियंता एस.एस.चारथळ यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकाºयांनी चर्चा केली. पाणीपुरवठ्या संदर्भातील विविध मुद्यांकडे त्यांनी अधिकाºयांचे लक्ष वेधले. यात लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला पाण्याची गरज किती, असा प्रश्न बोरकर यांनी उपस्थित केला. यावर अमरावती, बडनेरा शहराला अप्परवर्धा धरणातून रोज ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शहरात ९५ दशलक्ष लीटर जलशुद्धीकरणापुरतीच यंत्रणा असल्याने पाणीपुरवठ्यावरील ताण वाढल्याचे चारथळ यांनी सांगितले.शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्याबाबत काँग्रेस पदाधिकाºयांनी आक्षेप घेतला असता तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. सध्या पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत ही कामे केली जाणार आहेत.आश्वासनानंतर निवळले आंदोलनशहरात ११ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. यामुळे अनियमित पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, पाणीपुरवठयाच्या पाइपलाईनसाठी खोदलेले रस्ते व खड्डे दुरूस्त होत नाहीत. याशिवाय कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, सार्वजनिक नळ कुठल्याही परिस्थितीत बंद करू नयेत, असा मुद्दा मांडण्यात आला. माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर, प्रशांत डवरे, हरिभाऊ मोहोड, वंदना कंगाले, सुरेश स्वर्गे यांनी आक्रमक भूमिका घेत नादुरूस्त रस्ते त्वरित दुरूस्त करण्याची मागणी केली. यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.वार्षिक पर्जन्यमानात आलेली तूट व अप्पर वर्धा प्रकल्पातील अल्पसाठ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मजीप्राने घेतला होता. याची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून शहरात सुरू झाली होती. मात्र, आता अपरवर्धा धरण शंभर टक्के भरल्याने नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी विलास इंगोले, किशोर बोरकर यांनी यावेळी रेटून धरली. शहर काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्याची दखल घेत अधीक्षक अभियंता चारथळ यांनी येत्या दोन दिवसात शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन निवळले. यावेळी गणेश पाटील, नानाभाई सोनी, पुरूषोत्तम मुदंडा, बी.आर.देशमुख, राजा बांगळे, भैया पवार, अंबादास मोहिते, राजेंद्र लुणावत आदी उपस्थित होते.