शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लवकरच नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:33 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन : शहर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी गुरूवार २८ सप्टेंबर रोजी शहर काँग्रेसअध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्राधिकरण कार्यालवर धडक दिली.यावेळी मजीप्राचे अधीक्षक अभियंता एस.एस.चारथळ यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकाºयांनी चर्चा केली. पाणीपुरवठ्या संदर्भातील विविध मुद्यांकडे त्यांनी अधिकाºयांचे लक्ष वेधले. यात लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला पाण्याची गरज किती, असा प्रश्न बोरकर यांनी उपस्थित केला. यावर अमरावती, बडनेरा शहराला अप्परवर्धा धरणातून रोज ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शहरात ९५ दशलक्ष लीटर जलशुद्धीकरणापुरतीच यंत्रणा असल्याने पाणीपुरवठ्यावरील ताण वाढल्याचे चारथळ यांनी सांगितले.शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्याबाबत काँग्रेस पदाधिकाºयांनी आक्षेप घेतला असता तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. सध्या पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत ही कामे केली जाणार आहेत.आश्वासनानंतर निवळले आंदोलनशहरात ११ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. यामुळे अनियमित पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, पाणीपुरवठयाच्या पाइपलाईनसाठी खोदलेले रस्ते व खड्डे दुरूस्त होत नाहीत. याशिवाय कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, सार्वजनिक नळ कुठल्याही परिस्थितीत बंद करू नयेत, असा मुद्दा मांडण्यात आला. माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर, प्रशांत डवरे, हरिभाऊ मोहोड, वंदना कंगाले, सुरेश स्वर्गे यांनी आक्रमक भूमिका घेत नादुरूस्त रस्ते त्वरित दुरूस्त करण्याची मागणी केली. यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.वार्षिक पर्जन्यमानात आलेली तूट व अप्पर वर्धा प्रकल्पातील अल्पसाठ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मजीप्राने घेतला होता. याची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून शहरात सुरू झाली होती. मात्र, आता अपरवर्धा धरण शंभर टक्के भरल्याने नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी विलास इंगोले, किशोर बोरकर यांनी यावेळी रेटून धरली. शहर काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्याची दखल घेत अधीक्षक अभियंता चारथळ यांनी येत्या दोन दिवसात शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन निवळले. यावेळी गणेश पाटील, नानाभाई सोनी, पुरूषोत्तम मुदंडा, बी.आर.देशमुख, राजा बांगळे, भैया पवार, अंबादास मोहिते, राजेंद्र लुणावत आदी उपस्थित होते.