शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

शहरात लवकरच नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:33 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन : शहर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी गुरूवार २८ सप्टेंबर रोजी शहर काँग्रेसअध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्राधिकरण कार्यालवर धडक दिली.यावेळी मजीप्राचे अधीक्षक अभियंता एस.एस.चारथळ यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकाºयांनी चर्चा केली. पाणीपुरवठ्या संदर्भातील विविध मुद्यांकडे त्यांनी अधिकाºयांचे लक्ष वेधले. यात लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला पाण्याची गरज किती, असा प्रश्न बोरकर यांनी उपस्थित केला. यावर अमरावती, बडनेरा शहराला अप्परवर्धा धरणातून रोज ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शहरात ९५ दशलक्ष लीटर जलशुद्धीकरणापुरतीच यंत्रणा असल्याने पाणीपुरवठ्यावरील ताण वाढल्याचे चारथळ यांनी सांगितले.शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्याबाबत काँग्रेस पदाधिकाºयांनी आक्षेप घेतला असता तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. सध्या पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत ही कामे केली जाणार आहेत.आश्वासनानंतर निवळले आंदोलनशहरात ११ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. यामुळे अनियमित पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, पाणीपुरवठयाच्या पाइपलाईनसाठी खोदलेले रस्ते व खड्डे दुरूस्त होत नाहीत. याशिवाय कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, सार्वजनिक नळ कुठल्याही परिस्थितीत बंद करू नयेत, असा मुद्दा मांडण्यात आला. माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर, प्रशांत डवरे, हरिभाऊ मोहोड, वंदना कंगाले, सुरेश स्वर्गे यांनी आक्रमक भूमिका घेत नादुरूस्त रस्ते त्वरित दुरूस्त करण्याची मागणी केली. यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.वार्षिक पर्जन्यमानात आलेली तूट व अप्पर वर्धा प्रकल्पातील अल्पसाठ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मजीप्राने घेतला होता. याची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून शहरात सुरू झाली होती. मात्र, आता अपरवर्धा धरण शंभर टक्के भरल्याने नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी विलास इंगोले, किशोर बोरकर यांनी यावेळी रेटून धरली. शहर काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्याची दखल घेत अधीक्षक अभियंता चारथळ यांनी येत्या दोन दिवसात शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन निवळले. यावेळी गणेश पाटील, नानाभाई सोनी, पुरूषोत्तम मुदंडा, बी.आर.देशमुख, राजा बांगळे, भैया पवार, अंबादास मोहिते, राजेंद्र लुणावत आदी उपस्थित होते.