शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

शहरात लवकरच नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 21:33 IST

उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन : शहर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी गुरूवार २८ सप्टेंबर रोजी शहर काँग्रेसअध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्राधिकरण कार्यालवर धडक दिली.यावेळी मजीप्राचे अधीक्षक अभियंता एस.एस.चारथळ यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकाºयांनी चर्चा केली. पाणीपुरवठ्या संदर्भातील विविध मुद्यांकडे त्यांनी अधिकाºयांचे लक्ष वेधले. यात लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला पाण्याची गरज किती, असा प्रश्न बोरकर यांनी उपस्थित केला. यावर अमरावती, बडनेरा शहराला अप्परवर्धा धरणातून रोज ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शहरात ९५ दशलक्ष लीटर जलशुद्धीकरणापुरतीच यंत्रणा असल्याने पाणीपुरवठ्यावरील ताण वाढल्याचे चारथळ यांनी सांगितले.शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्याबाबत काँग्रेस पदाधिकाºयांनी आक्षेप घेतला असता तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. सध्या पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत ही कामे केली जाणार आहेत.आश्वासनानंतर निवळले आंदोलनशहरात ११ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. यामुळे अनियमित पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, पाणीपुरवठयाच्या पाइपलाईनसाठी खोदलेले रस्ते व खड्डे दुरूस्त होत नाहीत. याशिवाय कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, सार्वजनिक नळ कुठल्याही परिस्थितीत बंद करू नयेत, असा मुद्दा मांडण्यात आला. माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर, प्रशांत डवरे, हरिभाऊ मोहोड, वंदना कंगाले, सुरेश स्वर्गे यांनी आक्रमक भूमिका घेत नादुरूस्त रस्ते त्वरित दुरूस्त करण्याची मागणी केली. यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.वार्षिक पर्जन्यमानात आलेली तूट व अप्पर वर्धा प्रकल्पातील अल्पसाठ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मजीप्राने घेतला होता. याची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून शहरात सुरू झाली होती. मात्र, आता अपरवर्धा धरण शंभर टक्के भरल्याने नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी विलास इंगोले, किशोर बोरकर यांनी यावेळी रेटून धरली. शहर काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्याची दखल घेत अधीक्षक अभियंता चारथळ यांनी येत्या दोन दिवसात शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन निवळले. यावेळी गणेश पाटील, नानाभाई सोनी, पुरूषोत्तम मुदंडा, बी.आर.देशमुख, राजा बांगळे, भैया पवार, अंबादास मोहिते, राजेंद्र लुणावत आदी उपस्थित होते.