शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा न्यायालयात रवि राणा यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तर जेलमध्ये टाकले जाते, मुख्यमंत्र्यांवर टीका सूरज दाहाट - तिवसा : स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयात ...

शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तर जेलमध्ये टाकले जाते, मुख्यमंत्र्यांवर टीका

सूरज दाहाट - तिवसा : स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयात आमदार रवि राणा यांनी बुधवारी सकाळी ११.३० वाजता आंदोलनप्रकरणी सुनावणीसाठी हजेरी लावली. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तर तुरुंगात टाकले जाते, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका होती.

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करण्यात यावे, या मागणीसाठी बडनेराचे आमदार रवि राणा यांनी तिवसा तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीसमोर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यांच्यासह २० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी जामीन नाकारून चार दिवसांचा तुरुंगवास त्यांनी पत्करला होता. तिवसा न्यायालयात सुनावणीनंतर त्यांनी तिवसा येथे ‘लोकमत’शी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढलो, तर आमदारासह शेतकऱ्यांना कारागृहात डांबले जाते, असा आरोप त्यांनी केला. यावेळी युवा स्वाभिमानचे धीरज केने, जितू दुधाने, संदेश मेश्राम, तुषार राऊतकर, अश्विन उके आदी उपस्थित होते. न्यायालयाच्या प्रकरणात ॲड. आशिष लांडे हे कामकाज पाहत आहेत.

बॉक्स

राज्यात राष्ट्रपती शासन हवे

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागले पाहिजे. शिवसेना गुंडागिरी करीत आहे. नारायण राणे यांची अटक चुकीची आहे. त्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक आरोपीसारखी आहे, असेही रवि राणा म्हणाले.