शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

राज्यातील केशरी कार्डधारक १९ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 2:30 PM

सलग दुष्काळ अन् नापिकीचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रतिव्यक्ती पाच किलो धान्यशेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी योजना

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : सलग दुष्काळ अन् नापिकीचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वऱ्याडात नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३९ हजार ५५५ शेतकऱ्यांना ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्य वितरणाचे लक्ष्य होते.अमरावती, औरंगाबाद विभागासह नागपूर जिल्ह्यातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याप्रवण १३ जिल्ह्यांसाठी ही योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्याचा पुरवठा होत आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये जे लाभार्थी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ च्या अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नाहीत, अशाच शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींच्या परिमाणात लाभ दिला जात आहे. अमरावती विभागात नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३९ लाख शेतकऱ्यांसाठी ६ हजार ६०६ मेट्रिक टन गहू, २ हजार ९४८ मेट्रिक टन तांदूळ असे एकूण ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्याचे नियतन मंजूर करण्यात आले. ९ हजार ३९९ मेट्रिक टन धान्य उचल करण्यात येऊन ७ हजार ७३ मेट्रिक टन धान्याचे वितरण करण्यात आले. वाटपाची ही ७४ टक्केवारी आहे.अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख लाभार्थीविभागात या योजनेसाठी १९ लाख ३९ हजार लाभार्थींपैकी सर्वाधिक ६ लाख ३ हजार ३३२ अमरावती जिल्ह्यातील आहेत. येथे नोव्हेंबर महिन्यात २२२७ मेट्रिक टन धान्यवाटप करण्यात आले. अकोला जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ९३० लाभार्थींना ६७१ मेट्रिक टन, वाशिम जिल्ह्यात २ लाख ४६ हजार ९५७ लाभार्थींना ११४६ मेट्रिक टन, बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार १२१ लाभार्थींना ९७५ मेट्रिक टन व यवतमाळ जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार २१५ लाभार्थींना २००४ मेट्रिक टन रेशन धान्याचे सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले.विभागातील १९ लाख ३९ हजार लाभार्थींना सवलतीच्या दरात रेशन धान्याचे वाटप करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्याचे आवंटन मंजूर होते. पैकी ७ हजार ७३ मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले.- रमेश मावस्करउपायुक्त (पुरवठा)

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार