शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

राज्यातील केशरी कार्डधारक १९ लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 14:31 IST

सलग दुष्काळ अन् नापिकीचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रतिव्यक्ती पाच किलो धान्यशेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी योजना

गजानन मोहोड।आॅनलाईन लोकमतअमरावती : सलग दुष्काळ अन् नापिकीचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात रेशन धान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. वऱ्याडात नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३९ हजार ५५५ शेतकऱ्यांना ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्य वितरणाचे लक्ष्य होते.अमरावती, औरंगाबाद विभागासह नागपूर जिल्ह्यातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याप्रवण १३ जिल्ह्यांसाठी ही योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेच्या निकषानुसार शेतकऱ्यांना दोन रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्याचा पुरवठा होत आहे. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये जे लाभार्थी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम २०१३ च्या अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नाहीत, अशाच शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींच्या परिमाणात लाभ दिला जात आहे. अमरावती विभागात नोव्हेंबर महिन्यात १९ लाख ३९ लाख शेतकऱ्यांसाठी ६ हजार ६०६ मेट्रिक टन गहू, २ हजार ९४८ मेट्रिक टन तांदूळ असे एकूण ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्याचे नियतन मंजूर करण्यात आले. ९ हजार ३९९ मेट्रिक टन धान्य उचल करण्यात येऊन ७ हजार ७३ मेट्रिक टन धान्याचे वितरण करण्यात आले. वाटपाची ही ७४ टक्केवारी आहे.अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख लाभार्थीविभागात या योजनेसाठी १९ लाख ३९ हजार लाभार्थींपैकी सर्वाधिक ६ लाख ३ हजार ३३२ अमरावती जिल्ह्यातील आहेत. येथे नोव्हेंबर महिन्यात २२२७ मेट्रिक टन धान्यवाटप करण्यात आले. अकोला जिल्ह्यात २ लाख ५२ हजार ९३० लाभार्थींना ६७१ मेट्रिक टन, वाशिम जिल्ह्यात २ लाख ४६ हजार ९५७ लाभार्थींना ११४६ मेट्रिक टन, बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार १२१ लाभार्थींना ९७५ मेट्रिक टन व यवतमाळ जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार २१५ लाभार्थींना २००४ मेट्रिक टन रेशन धान्याचे सवलतीच्या दरात वाटप करण्यात आले.विभागातील १९ लाख ३९ हजार लाभार्थींना सवलतीच्या दरात रेशन धान्याचे वाटप करण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात ९ हजार ५५४ मेट्रिक टन धान्याचे आवंटन मंजूर होते. पैकी ७ हजार ७३ मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले.- रमेश मावस्करउपायुक्त (पुरवठा)

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार