शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
5
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
6
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
7
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
8
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
9
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
10
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
11
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
12
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
13
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
14
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
15
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
16
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
17
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
18
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
19
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
20
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

रब्बी हंगाम स्थिरावला, यवतमाळ-बुलडाण्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 6:54 PM

यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती : विभागात यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती विभागात यंदाच्या रब्बी हंगामात ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टरवर पेरणाचा अंदाज होता. त्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ५ लाख ३९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यंदा डिसेंबरपासून थंडी असल्याने गव्हाची पेरणी यंदा लवकर आटोपली. खरिपात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झाल्याने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पाण्याची पातळी आॅक्टोबर महिन्यातच दोन मीटरपेक्षा खोल गेल्याने सिंचनक्षमतांना मर्यादा आल्या आहेत. विहिरीतील पाण्याचीदेखील कमी झाली. त्याच्या परिणामी अमरावती, अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा पेरणी कमी झाली. यामुळे जिल्ह्यातील सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. अकोला जिल्ह्यात २९ हजार ८०० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३२ हजार ६०० हेक्टर, तर अमरावती जिल्ह्यात ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नापेर आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत  बुलडाणा जिल्ह्यात २३ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात २६ हजार १०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झाली आहे.

सध्या बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ३९ हजार ८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६३ हजार २०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख ४ हजार २०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७४ हजार ४००, वाशिम जिल्ह्यात ९२ हजार ६०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६० हजार हेक्टरमध्ये, अमरावती जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ३७ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात ७८ हजार सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ४ हजार क्षेत्रात पेरणी झाली आहे.

हरभ-याचे ४.२३ लाख हेक्टर क्षेत्र- यंदाच्या रबीमध्ये हरभ-यासाठी ३ लाख ४२ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ४ लाख २३ हजार ७०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी १२४ आहे. गव्हासाठी १ लाख ८० हजार ७०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ९५ हजार ५०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी ५५ आहे. जवस, तीळ व तेलबियाचे क्षेत्र यंदा निरंक राहिले आहे. रबी ज्वार ८० टक्के, तर करडईचे १४ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळAmravatiअमरावती