शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

विजेचा लपंडाव बेततोय जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 01:24 IST

शहरात नियमितपणे होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा फटका आरोग्यसेवेलाही बसत आहे. अलीकडे बड्या रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या यंत्रणा अत्याधुनिक असतात. त्यांना २४ तास विजेची गरज असते. मात्र, काहीही कारण नसताना दररोज अनेक प्रभागांत विजेचा लपंडाव केला जात असल्याने अतिदक्षता विभागातील यंत्रणा ठप्प पडतात.

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात नियमितपणे होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा फटका आरोग्यसेवेलाही बसत आहे. अलीकडे बड्या रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या यंत्रणा अत्याधुनिक असतात. त्यांना २४ तास विजेची गरज असते. मात्र, काहीही कारण नसताना दररोज अनेक प्रभागांत विजेचा लपंडाव केला जात असल्याने अतिदक्षता विभागातील यंत्रणा ठप्प पडतात. त्याकारणाने उपचार सुरू असताना नवजात शिशू अत्यवस्थ होऊन जिवालाही धोका निर्माण शक्यता नाकरता येत नाही. रविवारीसुद्धा बत्ती गूल होत असल्याने नागरिकांच्या ‘हॉलिडे’ नियोजनावर पाणी फेरले जात आहे.इतर दिवसांप्रमाणे रविवारही अनेकदा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नोकरदारांसह अनेकांच्या नियोजनावर पाणी फेरले जाते. पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित होत असल्याने काही दिवसांपासून नागरिकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. नियोजित भारनियमन नसताना महावितरणकडून विजेचा लपंडाव केला जात आहे. वीज ही मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनली आहे. त्याकारणाने नागरिकांना २४ तास विद्युत मिळणे अपेक्षित आहे. चांगली विद्युत सेवा मिळावी, या उद्देशानेच सोफीया प्रकल्पाला तेव्हा मान्यता देण्यात आली. तथापि, येथे वीजनिर्मिती होऊनही शहराला फायदा झालेला नाही. वीज इतरत्र विकली जाते, तर शहरातील अर्जुननगर, विनायक नगर, रुख्मिनीनगरासह अनेक प्रभागात नेहमीच हा विजेच्या लपंडावाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.विशेषत: रविवारीसुद्धा बत्ती गूल होत असल्याने नागरिकांची मोठी पंचाईत होेते. कारण सुटीचा दिवस पाहून हौैशी नागरिकांनी आप्तमंडळींसमवेत वेगवेगळे बेत आखलेले असतात. कुठे जेवणाची मेजवानी, तर कुठे छोेटेखानी कार्यक्रम ठरलेले असतात. घरगुती होम थिएटर्सवर चित्रपट बघत सुटीची मौज घेण्याचा बेत असतानाच बत्ती गूल होत असल्याने नागरिकांच्या नियोजनावर पाणी फेरले जाते.वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिक महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र अधिकाऱ्यांचे मोबाइल रविवारी हमखास बंद असतात किंवा त्यांच्याकडून अनेकदा प्रतिसाद मिळत नाही. त्याकारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय, हे कळू शकत नाही. तसेच शासकीय रुग्णालय, खासगी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्र लावलेले असतात. सदर यंत्र विजेशिवाय चालूच शकत नाही. त्याकारणाने जनरेटर सुरू न झाल्यास किंवा अचानक काही समस्या निर्माण झाल्यास विजेचा लपंडाव रुग्णांच्या जिवावरही बेतू शकतो. या सर्व प्रकाराची दखल अधीक्षक अभियंता सुहास मेहत्रे यांनी घेऊन नागरिकांना चांगली विद्युत सेवा द्यावी, अशी मागणी विद्युत ग्राहकांनी केली आहे.लहान मुलांना वाफारा देताना त्रासवातावरणात अचानक बदल झाल्याने चिमुकल्यांना या दिवसांत सर्दी-पडसे सतावते. मुलांच्या उपचाराकरिता पालक बालरोगतज्ज्ञांकडे धाव घेतात. नेब्यूलायझर (वाफारा) ने वाफ देत असताना अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्याने उपचार अर्ध्यावरच सोडावा लागतो. जिल्ह्यात किडनीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली असून, त्यांना नियमित डायलिसिसवर ठेवावे लागते. हा उपचार सुरू असताना, अनेकदा बत्ती गूल होत असल्याने डॉक्टरांना जनरेटर लावण्याकरिता धावपळ करावी लागल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. यामुळे सर्व बाबींकरिता वीज ही महत्त्वाची असून, असा विजेचा लपंडाव थांबवावा, अशी शहरातील डॉक्टरांचीही मागणी आहे.नवजात शिशूच्या जीवितालाही धोकानवजात शिशूचे तापमान व्यवस्थित ठेवण्याकरिता असलेले वार्मरस मशीन तथा व्हेंटिलेटरला उच्चदाबाची वीज हवी असते. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नवजात शिशूच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. अनेक नवजात शिशूंना सलाइन देताना ते अत्याधुनिक यंत्रणावर सेट करूनच द्यावी लागते. त्या यंत्राला उच्चदाबाची विद्युत लागते. अशावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास डॉक्टरांना जनरेटर सुरू करण्याकरिता धावपळ करण्यात किमान चार ते पाच मिनिटे जातात. सदर मशीन गरम व्हायलाही वेळ लागत असल्याने अशा स्थितीत नियोजन चुकून नवजात शिशूच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असते तसेच मशीन नव्याने सेट करावी लागते, असे मत बालरोगतज्ज्ञ अद्वैत पानट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अतिदक्षता विभागातील अत्याधुनिक यंत्रणाकरिता २४ तास वीजपुरवठा आवश्यक आहे. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित होत असेल, तर रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :electricityवीज