शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

दशकात दोन लाखांनी जिल्ह्याची लोकसंख्यावाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात सन २०११ च्या तुलनेत आता दोन लाखांनी लोकसंख्येत वाढ झालेली आहे. चार नगरपंचायतींच्या स्थापनेमुळे जिल्ह्याच्या नागरी ...

अमरावती : जिल्ह्यात सन २०११ च्या तुलनेत आता दोन लाखांनी लोकसंख्येत वाढ झालेली आहे. चार नगरपंचायतींच्या स्थापनेमुळे जिल्ह्याच्या नागरी क्षेत्रातही वाढ झालेली आहे. त्यातुलनेत सुविधा मात्र, जुन्याच आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण वाढत आहे. यामध्ये लोकसंख्यावाढीच्या निकषानुसारच प्रत्येक कामाचे नियोजन महत्त्वाचे असल्याची बाब आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने समोर आलेली आहे.

झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेरोजगारी व रोगराई यासह अनेक समस्या निर्माण होत आहेत. जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव व्हावी व याद्वारे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोकसंख्यावाढीमुळे विकासकामांना काही प्रमाणात खीळ बसत आहे.

मुलगाच हवा ही मानसिकता अलीकडे काहीसी कमी झाली असली असती तरी पूर्णपणे नष्ट झालेली नाही. लोकसंख्यावाढीमुळे एकीकडे सुखवस्तू, तर दुसरीकडे गरिबी ही दरी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ येणार कुठून, असे तज्ज्ञांचे म्ज्णेने आहे.

बॉक्स

जनगणनेची प्रक्रिया कोरोना संसर्गामुळे बाधित

मागच्या वर्षापासून सन २०२१ च्या जनगणनेची तयारी सुरू झाली. प्रगणकांचे प्रशिक्षणही आटोपले. त्यानंतर मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या मोहीमच थांबिविण्यात आलेली आहे. जिल्ह्यासह राज्याची एकूण स्थिती पाहता यंदा तरी जनगणनाची प्रक्रिया सुरू होणे शक्य वाटत नाही. जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिलेला आहे.

बॉक्स

दिन साजरा करण्याचे औचित्य

तरुणाईचे समान संरक्षण व सक्षमीकरण करणे, तरुणाईला जबाबदारीची जाणीव करून देणे, समाजातील लिंगनिहाय दृष्टिकोन हद्दपार करणे, मुलींच्या हक्काचे संरक्षणासाठीचे कायदे प्रभावी करण्यासाठी धोरण आखण्याची मागणी करणे, मुला-मुलींमध्ये समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे आदी हा दिन साजरा करण्यामागील औचित्य आहे.

बॉक्स

या कार्यक्रमांचा असावा समावेश

लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमात समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी कृतिशील कार्यक्रमासह कुटुंब नियोजनाचे महत्त्व, लिंग समानता, माता व शिशू आरोग्य, गरिबी, मानवी हक्क, आरोग्याचा हक्क, मुलींना शिक्षण, बालविवाह टाळणे यासह अनेक विषयांवर जागृती होणे महत्त्वाचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.