शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

दशकात दोन लाखांनी जिल्ह्याची लोकसंख्यावाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्ह्यात सन २०११ च्या तुलनेत आता दोन लाखांनी लोकसंख्येत वाढ झालेली आहे. चार नगरपंचायतींच्या स्थापनेमुळे जिल्ह्याच्या नागरी ...

अमरावती : जिल्ह्यात सन २०११ च्या तुलनेत आता दोन लाखांनी लोकसंख्येत वाढ झालेली आहे. चार नगरपंचायतींच्या स्थापनेमुळे जिल्ह्याच्या नागरी क्षेत्रातही वाढ झालेली आहे. त्यातुलनेत सुविधा मात्र, जुन्याच आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण वाढत आहे. यामध्ये लोकसंख्यावाढीच्या निकषानुसारच प्रत्येक कामाचे नियोजन महत्त्वाचे असल्याची बाब आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने समोर आलेली आहे.

झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेरोजगारी व रोगराई यासह अनेक समस्या निर्माण होत आहेत. जगातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची जाणीव व्हावी व याद्वारे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी ११ जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. लोकसंख्यावाढीमुळे विकासकामांना काही प्रमाणात खीळ बसत आहे.

मुलगाच हवा ही मानसिकता अलीकडे काहीसी कमी झाली असली असती तरी पूर्णपणे नष्ट झालेली नाही. लोकसंख्यावाढीमुळे एकीकडे सुखवस्तू, तर दुसरीकडे गरिबी ही दरी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ येणार कुठून, असे तज्ज्ञांचे म्ज्णेने आहे.

बॉक्स

जनगणनेची प्रक्रिया कोरोना संसर्गामुळे बाधित

मागच्या वर्षापासून सन २०२१ च्या जनगणनेची तयारी सुरू झाली. प्रगणकांचे प्रशिक्षणही आटोपले. त्यानंतर मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या मोहीमच थांबिविण्यात आलेली आहे. जिल्ह्यासह राज्याची एकूण स्थिती पाहता यंदा तरी जनगणनाची प्रक्रिया सुरू होणे शक्य वाटत नाही. जिल्हा प्रशासनाने याला दुजोरा दिलेला आहे.

बॉक्स

दिन साजरा करण्याचे औचित्य

तरुणाईचे समान संरक्षण व सक्षमीकरण करणे, तरुणाईला जबाबदारीची जाणीव करून देणे, समाजातील लिंगनिहाय दृष्टिकोन हद्दपार करणे, मुलींच्या हक्काचे संरक्षणासाठीचे कायदे प्रभावी करण्यासाठी धोरण आखण्याची मागणी करणे, मुला-मुलींमध्ये समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे आदी हा दिन साजरा करण्यामागील औचित्य आहे.

बॉक्स

या कार्यक्रमांचा असावा समावेश

लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमात समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी कृतिशील कार्यक्रमासह कुटुंब नियोजनाचे महत्त्व, लिंग समानता, माता व शिशू आरोग्य, गरिबी, मानवी हक्क, आरोग्याचा हक्क, मुलींना शिक्षण, बालविवाह टाळणे यासह अनेक विषयांवर जागृती होणे महत्त्वाचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.