शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

मुस्कान अभियानात पोलिसांनी शोधली १८ मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST

अमरावती : हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या आई-वडिलांना स्वाधीन करण्याकरिता पोलिसांच्यावतीने १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मुस्कान अभियान ...

अमरावती : हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या आई-वडिलांना स्वाधीन करण्याकरिता पोलिसांच्यावतीने १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मुस्कान अभियान -९ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या पंधरवड्यात पोलिसांनी १८ मुलांचा शोध घेतला. यापैकी ११ मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. सात मुलांना बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले. मुस्कान अभियानात शोध लावलेल्या १८ मुलांमध्ये सहा मुले, तर १२ मुलींचा समावेश आहे. ही मुले हरविल्यानंतर रस्त्यावर भीक मागून किंवा कुणाच्याही साह्याने जीवन जगल्याचे पोलिसांनी सांगितले. आपली मुले परत मिळाल्याबदल पालकांच्या चेहऱ्यावरील हास्य फुल्ले. काही मुले पारधी समाजाचीदेखील असल्याचे निष्पन्न झाले.

बॉक्स

जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दाखल तक्रारी

महिना दाखल तक्रारी सापडलेली मुले

जानेवारी ११ १०

फेब्रुवारी ९ ९

मार्च ५ ४

एप्रिल २ २

मे २ १

जून ६ ६

जुलै ५ ५

ऑगस्ट ५ ४

सप्टेंबर ६ ६

ऑक्टोबर १० ८

नोव्हे्बर १२ ३

एकूण ७३ ५८

स्टोरी १) मतिमंद मुलांचा शोध

गाडगेनगर ठाणे हद्दीतील एक १६ वर्षीय मतीमंद मुलगा हरविला गेला होता त्याच्या पालकांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसानी यशस्वी शोध घेवून त्याला एकाच दिवसात शोधून पालकांच्या स्वाधीन केले.

२) पळून गेलेल्या मुलीचा शोध

प्रेम प्रकरणातून प्रियकरासोबत पळून गेलेल्या एका १६ वर्षीय मुलीला पोलिसानी इंदोर येथून शोधून आणले. तिच्या पालकाने अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी पोलिसांनी खामगावच्या युवकालाही ताब्यात घेतले आहे.

३)स्टोरी

भीक मागणारे सात जण सापडले

घरातून निघून गेले. मात्र आई-वडिलांनी शोधल्यानंतरही मिळाले नाही. अशा मुलांवर सिग्नलवर भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. यात ५ ते १२ वर्षांच्या बालकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना बालकल्याण समितीच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहे.

कोट

मुस्कान अभियान एक महत्त्वाचे अभियान आहे. याकरिता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वांनी हिरीरीने हे अभियान राबविण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. त्यासंदर्भाचे आदेश देण्यात आले आहे. त्याकरिता विशेष पथकही तयार केले आहे.

- आरती सिंह, पोलीस आयुक्त अमरावती