शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वैयक्तिक लाभ योजना : पावसाळ्यात २८ हजार मजुरांच्या हाताला काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:26 IST

मग्रारोहयो : अचलपूर, चिखलदरा, मोर्शी, धारणी तालुक्यात कामे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून भर पावसाळ्यात जिल्हाभरात ४,२३३ कामे सुरू आहेत. याद्वारे सद्यःस्थितीत २७,५६६ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेसह वृक्षलागवड, फळबाग लागवड, रोपवाटिका, घरकुलाची कामे होत असल्याने दिलासा मिळाला आहे. 

ग्रामपंचायतस्तरावर कामाची हमी देणारी ही योजना ठरली आहे. गतवर्षी दरदिवशी २७३ रुपये, तर यंदा २९७ रुपये अशी मजुरी या कामांवर मिळत आहे. पावसाळ्यात मजुरांची संख्या रोडावली असली तरी कामाच्या शोधात स्थलांतरित होण्याची वेळ मजूरवर्गावर येणार नाही, अशी एकूण स्थिती आहे. ग्रामपंचायतीकडे नमुना अर्जाद्वारे कामाची मागणी व नोंदणी केल्यावर संबंधित व्यक्तीच्या हाताला पंचायत समितीद्वारे काम मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून जॉब कार्डधारक व्यक्तीला केंद्र शासनाच्या वतीने १०० दिवस, तर राज्य शासनाच्या वतीने १६५ असे एकूण ३६५ दिवस म्हणजेच वर्षभर कामाची हमी मिळत आहे. या योजनेद्वारे वैयक्तिक लाभाच्या योजनेद्वारे कुटुंबातील सदस्यांनाच इतरही मजुरांना कामे मिळत आहेत.

तालुकानिहाय सुरू असलेली कामेसद्यःस्थितीत अचलपूर तालुक्यात ६१७, अमरावती १२६, अंजनगाव सुर्जी ८४, भातकुली १६४, चांदूर रेल्वे १४४, चांदूरबाजार ३७६, चिखलदरा ७९३, दर्यापूर १८७, धामणगाव १३८, धारणी ४२४, मोर्शी ५३८, नांदगाव १४८, तिवसा २१३ व वरुड तालुक्यात २९१ कामे सुरू आहेत.

चिखलदरा, मोर्शी तालुक्यात सर्वाधिक मजूरअचलपूर १९९२, चांदूर रेल्वे १०१३, अंजनगाव सुर्जी ५८४, अमरावती ८४०, भातकुली ६३८, चांदूरबाजार १९९६, चिखलदरा ६०५१, दर्यापूर ९०३, धामणगाव ६२८, धारणी ३०९१, मोर्शी ५४९९, तिवसा १५००, नांदगाव खंडेश्वर ५६१ व वरुड तालुक्यात २,२७० हातांना काम मिळाले आहे.

"पावसाळ्यात सध्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसह वृक्षलागवड, रोपवाटिका , घरकुल, फळबाग लागवड आदी ४,२३३ कामे सुरू आहेत. याद्वारे २७ हजारांवर मजुरांना रोजगार मिळाला आहे."

- ज्ञानेश घ्यार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) 

टॅग्स :Amravatiअमरावती