शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतातील मजुरांवर शेतकऱ्यांची मदार

By admin | Updated: December 16, 2015 00:24 IST

बळीराजा आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी खचला आहे. लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांच्या आश्वासनांवरून त्यांचा विश्वास उडाला आहे, ...

अचलपूर : बळीराजा आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी खचला आहे. लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांच्या आश्वासनांवरून त्यांचा विश्वास उडाला आहे, अशी शेतकऱ्यांची स्थिती असताना शेतमजुरांच्या रूपाने त्यांचेसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. परप्रांतीय शेतमजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. अचलपूर तालुक्यात काही प्रमाणात नौकरदार वर्ग असला तरी येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याचे ६४६३०.५ हेक्टर क्षेत्रफळ आहे. शेती ५४११६ हेक्टरमध्ये केली जाते. बहुसंख्य शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके घेतो. संत्रा उत्पादक शेतकरी मृगबहराची व आंबा बहराची संत्रा पिके घेतो. भाजीपाल्याचेही उत्पादन अल्प शेतकरी घेत असतात. केळीचीही लागवड केली आहे. कपाशी हे पीक मोठ्या कालावधीचे व जास्त मजुरांचे आहे. पण कापूस वेचायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजूर मिळाले तर कापूस वेचण्याचे दर ६ ते ८ रुपयांपर्यंत मागतात. त्यामुळे प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलाही शेतात कापूस वेचायला जाताना दिसतात. बाजारात कापसाला चांगला भाव नाही. त्यामुळे कापूस उत्पादक हैराण झाले आहेत.शेतात कापूस मोठ्या प्रमाणात निघाला आहे. परंतु प्रत्येक कापूस उत्पादकांची हीच परिस्थिती असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर मिळणे कठीण झाले आहे. हल्ली शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील लोकांना कमी भावाने शिधापत्रिकेवर मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ मिळत असल्यामुळे बहुसंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. घराघरांत ५ ते ६ व्यक्ती असले तरी प्रत्यक्ष काम २ ते ३ व्यक्ती करत आहे. कुटुंबाचे आरोग्य कपडे, अन्न, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आणि घर या आवश्यक गरजा भागविण्यासाठी पूर्वी कुटुंबातील प्रत्येक सदस्य मिळेल ते काम करत होता. आता त्यांचेसाठी शासकीय योजनांचा पूर आला आहे. कोणतेही कष्ट न करता या योजना लाटून नंतर विकून मौजमजा करीत प्रसंगी वरली मटक्याच्या टपरीवर रिकामा दिवस घालविण्याची मानसिकता ग्रामीण भागात वाढत आहे. याचा थेट परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे. शेतात मजूर मिळत नाही, महिनेवारी येण्याचे दिवस आता संपले आहेत, मजूर मनमानी मजुरी मागतात ते काम दिवसातून २-४ तासांत उरकवून दुप्पट-तिप्पट मजुरी प्राप्त करतात. कमी वेळात थोड्या श्रमात भरपूर पैसा मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्गात व्यसनाधिनता वाढत असल्याचे दिसते. घरात खायला धान्य नाही, रहायला साधे घर नाही. परंतु मोटारसायकल, महागडे मोबाईल, गुटख्याच्या पुड्या, दारू या बाबी साध्या मजुराजवळही सर्रास आढळतात. इतर गरजा राज्य सरकार पुरवीत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व खऱ्या कष्टकऱ्यांची गोची होत जाते. कोणी कामावर यायला तयार झाल्यास तो म्हणेल ती मजुरी व तो म्हणेल तेच काम, इतकेच नव्हे तर तो म्हणेल तेवढाच वेळ मान्य करावा लागतो त्यामुळे मजुराच्या मदतीशिवाय कोणते पीक येईल याचा विचार शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधीकाळी समृध्द असलेल्या ग्रामीण भाग विविध योजनांमुळे व्यवसाधीन व दरिद्री होत असल्याचे दिसत आहे.