शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहने आरटीओच्या रडारवर, भरारी पथक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 15:27 IST

 शहरातून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे शहरातून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अपर परिवहन आयुक्तांनी ९ ऑगस्ट रोजी राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

अमरावती, दि. 18-  शहरातून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड वाहनांवर कारवाईचे आदेश अपर परिवहन आयुक्तांनी ९ ऑगस्ट रोजी राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोमवार १४ ऑगस्टपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. १४ ते ३१ ऑगस्ट दरम्यान भरारी पथकामार्फत ही मोहीम राबविली जाईल.

क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे अपघात होतात आणि रस्त्यांचेही नुकसान होत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे १५ दिवस अशा वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. याकारवाईकरिता प्रत्येक आरटीओ कार्यालयातील एक सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहन निरीक्षक यांची नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियंत्रणाखाली विभागातील सर्व वायुपथकांमध्ये किमान एक मोटार वाहन निरीक्षक, एक सहायक मोटार वाहन निरीक्षक व दोन क्लार्क यांची नेमणूक केली आहे.

विशेष म्हणजे पथकाला ही कारवाई स्वत:च्या विभागात न करता परिवहन आयुक्तांनी ठरवून दिलेल्या दुसऱ्या कार्यालयात करावयाची आहे. तपासणी मोहिमेला सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली नाही. या मोहिमेवर सहपरिवहन आयुक्तांचा ‘वॉच’ राहणार असल्याची माहिती आहे. दरदिवशी किमान दहा वाहनांवर कारवाईचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार ओव्हरलोड वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई सुरू आहे.-विजय काठोडे, प्रभारी आरटीओ