शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

विरोधकांनी नौटंकी करून नागरिकांची दिशाभूल करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

वरूड : शहरात उपजिल्हा रुग्णालय २०१३ पासून प्रस्तावित आहे. शासनाच्या प्रस्तावानुसार वैद्यकीय अधीक्षक यांनी २०१६ मध्ये महसूल विभागाला जागेची ...

वरूड : शहरात उपजिल्हा रुग्णालय २०१३ पासून प्रस्तावित आहे. शासनाच्या प्रस्तावानुसार वैद्यकीय अधीक्षक यांनी २०१६ मध्ये महसूल विभागाला जागेची मागणी केली होती. परंतु, शासकीय जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल तत्कालीन तहसीलदार यांनी दिला. शहरातील दानशूर डॉ. सुधाकर बंदे यांनी तीन एक्कर जागा दिल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटला असून, प्रशासकीय मान्यता, इमारत नकाशाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. परंतु, विरोधकांनी धरणे आंदोलन करून आमदार देवेंद्र भुयार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालविल्याने ती नौटंकी बंद करा, आम्ही चोख प्रतिउत्तर देण्यास तयार आहे, असे आवाहन महाविकास आघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्यावतीने घेतलेल्या पत्रपरिषदेत केले.

उपजिल्हा रुग्णालय २०१३ पासून प्रस्तावित आहे. शासनाच्या प्रस्तावानुसार वैद्यकिय अधिक्षक यांनी २०१६ मध्ये महसुल विभागाला जागेची मागणी केली होती परंतु शासकिय जागा उपलब्ध नसल्याचा अहवाल तत्कालीन तहसीलदार यांनी दिला. शहरातील दानशुर डॉ .सुधाकरराव बंदे यांनी तीन वर्षपूर्वी तीन एक्कर जागा देण्यासंदर्भात समर्थता दर्शवली होती मात्र माजी आमदार डॉ. बोंडे तथा कोणीही राजकिय पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही. परंतु सत्ता परिवर्तनानंतर महाविकास आघाडीचे आ. देवेंद्र भुयार यांनी उपजिल्हारुग्णालयाच्या प्रश्नाकडे लक्ष घालुन जागेची पाहणी केली संबंधित प्रकरणाचा पाठपुरावा केला. काम नेमके कोठे थांबले आहे. काय अडचण आहे. यासंदर्भात बंदे दांम्पत्यांशी वारंवार बैठका घेतल्या, सबंधित बाबींचा शासकिय पाठपुरावा करुन अखेर विना अट जागा देण्यासंदर्भात बंदे दांम्पत्यांनी होकार दर्शविल्या नंतर सदरील प्रकरणाला गती आली. २०१३ च्या आरोग्य विभागाच्या महाराष्ट्रातील बृहत आराखड्यामध्ये वरुड येथील उपजिल्हा रुग्णालय प्रस्तावीत होते. २०१३ ते २०२० पर्यंत याला प्रशासकीय मंजुरी सुद्धा नव्हती. आ.देवेंद्र भुयार यांच्या पाठपुराव्यामुळे २४ फेब्रुवारी, २०२० ला प्रशासकिय मंजूरी मिळाली. ०४ मार्च २०२० ला आरोग्य मंत्र्यांना पत्रव्यवहार केला. १४ एप्रिल, २०२० ला आमदार भुयार यांनी घेतलेल्या सभेमध्ये सुधाकरराव मारोतराव बंदे यांनी डॉ. मिना बंदे उपजिल्हा रुग्णालय नाव देण्याच्या अटीवर जागा देण्याचे कबुल केले, व तसा १६/०४/२०२० ला वैद्यकिय अधिक्षक प्रमोद पोतदार सर यांनी पत्र व्यवहार केला होता . परंतु शासन निर्णयानुसार नाव देता येत नाही अशी बाब पुढे आल्याने बंदे दामपत्यांनी विना अट जागा देण्याचे कबुल केले. यानुसार २३ फेब्रुवारी २०२१ रोजी डॉ. बंदे दाम्पत्यांने जागेची शासनाला दानपत्र सुध्दा करुन दिले. मार्च महिण्यात जागा शासनाच्या नावे फेरफार सुध्दा झाली. उपजिल्हा रुग्णालयाला प्रशासकिय मंजुरिपासून तर जागेचे दान पत्र करुन घेण्याची प्रक्रिया ही एक वर्षात झाली.शासकीय रक्तपेढी ही २८ऑगस्ट २०१९ ला तत्कालीन आमदार अनिल बोंडे यांच्या काळात प्रशासकिय मंजुरी मिळाली होती मात्र आ .भुयार यांनी १४ जानेवारी २०२० ला रक्तपेढी बांधकाम तातडीने करुन रक्तपेढी कार्यान्वित करण्याबाबत आरोग्य विभागाला पत्रव्यवहार केला. शासन नियमानुसार रक्तपेढी व उपजिल्हा रुग्णालय हे एकाच ठिकाणी असायला पाहिजे. या नुसार येत्या काळात लगेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. विरोधकांनी विनाकारण स्वत:च्या प्रसिद्धीसाठी जनआंदोलन करु नये. काम हे सुरु असल्याने सार्वजनिक हिताच्या कामांसाठी आंदोलन करणाऱ्यांनी यांनी राजकिय वातावरण तापविण्याचा प्रयत्न करून जनतेला भ्रमीत करु नये, रक्तपेढी निर्मिती आंदोलन समितीशी आ. देवेंद्र भुयार चर्चा करायला तयार आहे. स्वघोषीत समाजसुधारक हे सुध्दा आमदारांना वारंवार विरोध करतात. त्यांचा मुळ हेतू हा आहे की, आमदारांनी आपल्या कामांकडे विषयांतर करुन जतनेत संभ्रम निर्माण करण्याचा हेतू तथाकथित समाजसुधारकांचा राहतो. रक्तपेढी किंवा जिल्हा रुग्णालय या विषयावर संभ्रम निर्माण करुन त्यांचे श्रेय आमदारांना जाऊ नये या उद्देशाने नौटंकी केल्या जात असून नागरिकांना भ्रमित करण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष ऋषिकेश राऊत , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील , शहराध्यक्ष जितेंन शहा , सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर काळे , माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ कुकडे यांनी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन केले आहे .