शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By गणेश वासनिक | Updated: October 25, 2022 17:03 IST

वाड्या,पोड, टोला, तांडा यांनाच बसणार फटका

अमरावती : राज्यात कमी लोकसंख्या असलेल्या दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या वाड्या, पोड, टोला आणि तांड्यावर २० पेक्षा कमी पटसंख्येच्या बहुतांश शाळा आहेत. या शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव आहे. त्यामुळे राज्यात २० विद्यार्थी पटांच्या शाळांची संख्या १४ हजार ९८५ असून त्या बंद होण्याची भिती आहे. या शाळांमधील जवळपास दीड लाख विद्यार्थीशिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने ६७ हजार ७५५ रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव सादर केला. पण शिक्षण संचालनालयाने २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागविली आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा शासनाचा इरादा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. केंद्र व राज्य शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा व नियम करुन शिक्षणाची हमी दिलेली आहे. याचे सरकार नक्कीच उल्लंघन करीत आहे. नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचा प्रयत्नही केला तरी जाण्या-येण्याचा प्रश्न आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही दुर्गम व डोंगराळ भागातील वाड्या, पोड, टोला व तांड्यावर पक्का रस्ता पोहोचलेला नाही. त्यामुळे वाहनेही धावत नाही. अशा विचित्र व विक्षिप्त परिस्थितीत शाळा बंद झाल्यास विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या जाईल आणि त्यांचे शिक्षण थांबेल, यात दुमत नाही.

- तर शाळा बंदचा फटका गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांनाच

शाळा विद्यार्थ्यांसाठी त्याच्या घरी, विटभट्टीवर, साखर कारखान्यावर त्याच्या मागे धावत होती. आज मात्र विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेच्या मागे धावत असताना शाळा मात्र त्यांच्यापासून दूर जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असे होऊ नये. गरिबांचे शिक्षण वाचविण्यासाठी २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे. 

अशी आहे सहा विभागात २० पटांच्या शाळांची संख्या१) अमरावती - १२२८२) नागपूर - २३९९३) कोकण - ४३८०४) नाशिक - १४९४५) पुणे - ३४३५६) औरंगाबाद - २०४९                  २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनातून केली आहे. या शाळा बंद करणे म्हणजे गरीब, आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणे आहे. शिक्षण हक्क कायद्याला छेद देण्याचा निर्णय आहे. याविरूद्ध लढा उभारला जाईल. 

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम. महाराष्ट्र

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीSchoolशाळा