शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

६ विभागातील दीड लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याचा धोका; ट्रायबल फोरमचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन

By गणेश वासनिक | Updated: October 25, 2022 17:03 IST

वाड्या,पोड, टोला, तांडा यांनाच बसणार फटका

अमरावती : राज्यात कमी लोकसंख्या असलेल्या दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या वाड्या, पोड, टोला आणि तांड्यावर २० पेक्षा कमी पटसंख्येच्या बहुतांश शाळा आहेत. या शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव आहे. त्यामुळे राज्यात २० विद्यार्थी पटांच्या शाळांची संख्या १४ हजार ९८५ असून त्या बंद होण्याची भिती आहे. या शाळांमधील जवळपास दीड लाख विद्यार्थीशिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने ६७ हजार ७५५ रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव सादर केला. पण शिक्षण संचालनालयाने २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागविली आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा शासनाचा इरादा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. केंद्र व राज्य शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा व नियम करुन शिक्षणाची हमी दिलेली आहे. याचे सरकार नक्कीच उल्लंघन करीत आहे. नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचा प्रयत्नही केला तरी जाण्या-येण्याचा प्रश्न आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही दुर्गम व डोंगराळ भागातील वाड्या, पोड, टोला व तांड्यावर पक्का रस्ता पोहोचलेला नाही. त्यामुळे वाहनेही धावत नाही. अशा विचित्र व विक्षिप्त परिस्थितीत शाळा बंद झाल्यास विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या जाईल आणि त्यांचे शिक्षण थांबेल, यात दुमत नाही.

- तर शाळा बंदचा फटका गरीब, आदिवासी विद्यार्थ्यांनाच

शाळा विद्यार्थ्यांसाठी त्याच्या घरी, विटभट्टीवर, साखर कारखान्यावर त्याच्या मागे धावत होती. आज मात्र विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेच्या मागे धावत असताना शाळा मात्र त्यांच्यापासून दूर जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असे होऊ नये. गरिबांचे शिक्षण वाचविण्यासाठी २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी ट्रायबल फोरमने केली आहे. 

अशी आहे सहा विभागात २० पटांच्या शाळांची संख्या१) अमरावती - १२२८२) नागपूर - २३९९३) कोकण - ४३८०४) नाशिक - १४९४५) पुणे - ३४३५६) औरंगाबाद - २०४९                  २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनातून केली आहे. या शाळा बंद करणे म्हणजे गरीब, आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवणे आहे. शिक्षण हक्क कायद्याला छेद देण्याचा निर्णय आहे. याविरूद्ध लढा उभारला जाईल. 

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम. महाराष्ट्र

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीSchoolशाळा