शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मिनिमंत्रालयातील फायलींची आता प्रतीक्षा संपली

By admin | Updated: September 22, 2015 00:32 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात ...

सुनील पाटील रूजू : प्रभारी सीईओ लांडगे यांनी पदभार सोडलाअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात जोखीमीचे कामे करताना येणाऱ्या अडचणीचा फटका महत्वाच्या फायलींना बसला होता.मात्र आता मुळ नियुक्तीवर असलेली मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांनी सोमवारी आपल्या पदाची सूत्रे स्विकारल्याने मिनिमंत्रालयातील प्रलंबीत फायलीचा मार्ग मोकळा आल्याने पदाधिकारी सदस्य यांच्या अडचणी दुर होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील हे मागील ६ आॅगस्ट पासून म्हसुरी येथे ४५ दिवसांच्या प्रशिक्षणावर गेले होते. त्यांचा ६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचा कालावधी संपला आहे. त्यानंतर ते २० सप्टेंबरपर्यंत रजेवर असल्याने त्याचा कार्यभार विभागीय आयुक्त कार्यायातील आस्थापना विभागाचे उपायुक्त सुनील लांडगे यांच्याकडे अतिरिक्त सोपविण्यात आला होता. त्यामुळे त्यांना मुख्य जबाबदारीसह जिल्हा परिषदेचे कामकाज सांभाळावे लागत आहे. अशातच वरिष्ठ पातळीवरून दररोज घेण्यात येणाऱ्या बैठका आणि विविध विषयांवर होणाऱ्या व्हीडीओ कॉन्सफस आणि अन्य कामांचा ताण वाढत आहे. याच कामकाजात व दौऱ्यात अधिक वेळ जातो. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजा संबंधित महत्त्वाच्या फायली लांबणीवर पडत आहेत. विशेष म्हणजे लांडगे यांच्याकडे केवळ काही दिवसापर्यतच अतिरिक्त पदभार सोपविला असल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारील सदस्य व विभागा प्रमुख यांच्या कडून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे येणाऱ्या महत्वाच्या फायली पैकी काही फायली जोखमीच्या असल्याने याला हात न लावलेलाच बरा अशी अवस्था प्रभारी अधिकाऱ्यांची झाली होती. त्यानीच अशा फायलीचा निपटारा केला बरा अशा मानसिकतेत अधिकारी होते. त्यामुळे आता जोखीमीची कामे व महत्वाच्या प्रशासकीय कामकाजाच्या फायली सुनिल पाटील रूजू झाल्यामुळे मोकळया करण्याची प्रक्रीया २१ सप्टेबर पासून जिल्हा परिषदेत सुरू झाल्याने पदाधिकारी, विभाग प्रमुख यांच्या प्रलंबीत फायलीचा निपटारा विहीत वेळेत होणार आहे.जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कामकाज विहीत वेळेत मार्गी लावण्यासाठी प्रशासनाचा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडताना नेहमीच प्राधान्य आहे. त्याच दृष्टिकोनातून कामाच्या फायली योग्य पडताळणी करून निकाली काढल्या जातील.- सुनील पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.