शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आता व्याघ्र गणनेसाठी जीपीएस एम- ट्रॅक, जानेवारीत दोन टप्प्यांत होणार गणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 17:34 IST

अमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी जानेवारीत होणा-या व्याघ्र गणनेत पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक हे अ‍ॅप्लिकेशन वापरले जाणार आहे.

गणेश वासनिकअमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी जानेवारीत होणा-या व्याघ्र गणनेत पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक हे अ‍ॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. पायांचे ठसे, ट्रॅपिंग कॅमेरे आदी पारंपरिक पद्धतीदेखील व्याघ्र गणनेची वैशिष्ट्ये राहणार आहेत.व्याघ्र गणना राज्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य, नवेगाव बांध, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, बोर अभयारण्य आणि सह्याद्री अभयारण्यात होणार आहे. व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि जंगल क्षेत्रात व्याघ्र गणना केली जाईल. जीपीएस एक-ट्रॅक ही प्रणाली पहिल्यांदाच वापरली जात असल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पात अधिका-यांच्या एका तुकडीला प्रशिक्षण देण्यात आले. ही तुकडी त्यांच्या क्षेत्रातील अधिकारी, कर्मचा-यांना व्याघ्र गणनेबाबत प्रशिक्षण देणार आहे.राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाकडून दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. यापूर्वी २०१४ मध्ये व्याघ्र गणना झाली. आता त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये होत आहे. दोन टप्प्यांत गणना होणार असून, पहिल्या टप्प्यात ट्रॅपिंग कॅमेरे, तर दुस-या टप्प्यांत पाच दिवस जीपीएस एम-ट्रॅकद्वारा गणना केली जाईल. यात दरदिवशी वनरक्षकांना ३०, तर वनपालांना २० किमी पायी प्रवास करणे अनिवार्य केले आहे. वाघांच्या पायाचे ठसे, विष्ठा, शिकारीचे प्रकार आदींचा अभ्यास करून माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर राज्यनिहाय गणनेची माहिती दिल्ली येथील एनटीसीएकडे पाठविली जाईल.व्याघ्र गणनेत वनविभाग, वन्यजीव, एनटीसीए, डब्ल्यूआयआय, एनजीओंचा सहभाग राहील. जीपीएस एम- ट्रॅक हे अत्याधुनिक यंत्र वापरासाठीचे प्रशिक्षण पेंच व्याघ्र प्रकल्पात ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान देण्यात आले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गंत अधिकारी, कर्मचा-यांना १८, १९, २० डिसेंबर रोजी गणनेबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या व्याघ्र गणनेची तारीख अद्यापही निश्चित झाली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.जीपीएस एम- ट्रॅकची वैशिष्ट्येजंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनकर्मचा-यांना जंगलात पायी गस्त घालण्याची सक्ती आहे. वनरक्षक ३०, तर वनपालांना २० किमी अंतर दरदिवसाला कापावे लागते. जीपीएस एम- ट्रॅक अ‍ॅप्लिकेशनमुळे कोणी, किती अंतर गाठले, हे क्षणात कळते. हीच प्रणाली व्याघ्र गणनेसाठी वापरली जाणार आहे.व्याघ्र गणनेसाठी पहिल्यांदाच जीपीएस एम- ट्रॅक अ‍ॅप्लिकेशन वापरले जात आहे. त्याकरिता अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गणनेसाठी पारंपरिक व अत्याधुनिक यंत्रणेची जोड दिली आहे.- निशांत वर्मासंचालक, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, दिल्ली.

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती