शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हाधिका-यांकडे शिष्यवृत्तीचे नियंत्रण, अमरावतीत १.६० लाख शिष्यवृत्ती अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 18:55 IST

मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालये आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. परिणामी अमरावती विभागात १ लाख ९२ हजार ८१८ प्राप्त अर्जांपैकी १ लाख ६० हजार ३४१ शिष्यवृत्तीचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

अमरावती - मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालये आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. परिणामी अमरावती विभागात १ लाख ९२ हजार ८१८ प्राप्त अर्जांपैकी १ लाख ६० हजार ३४१ शिष्यवृत्तीचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना गोंधळातून सुटका मिळावी, यासाठी आता जिल्हाधिकाºयांकडे शिष्यवृत्तीचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे.अगोदर आॅफलाईन त्यानंतर आता आॅनलाईन असा प्रवास करणा-या शिष्यवृत्ती योजनेचा गाडा अद्यापही रूळावर आलेला नाही. अनुसूचित जाती/ जमातीच्या व अन्य घटकातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा पुरता बोझवारा उडाला आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज मान्यतेअभावी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे ७५ ते ८० टक्के प्रलंबित आहे. शैक्षणिक सत्र २०१८-२०१९ या वर्षातील ही आकडेवारी असून, शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाडीबीटीद्वारे विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतरही वेळेपूर्वी त्याला मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी व एससी संवर्गातून श्षियवृत्तीसाठी आलेल्या अर्जावर दखल घेण्यात येत नाही. शिष्यवृत्तीतील गोंधळ दूर करण्याची जबाबदारी जिल्हाधिका-यांवर सोपविली आहे. आठ दिवसांत याबाबतचा सकारात्मक निर्णय घेऊन महाविद्यालये आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात जिल्हाधिकारी समन्वय साधतील, अशी तयारी करण्यात आली आहे.       अमरावती विभागात ३२ हजार ४७७ अर्ज मंजूरअमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ओबीसी, एससी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातून १,९२,८१८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सामाजिक न्याय विभागाने ३२,४७७ अर्ज मंजूर केले. यात अमरावती जिल्हा ४१,०९१, अकोला-१४,७३०, यवतमाळ-२०,९७४, बुलडाणा-२१,२५२, तर वाशीम जिल्ह्यात ११,५०१ एवढे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी सामाजिक न्याय विभागाने अमरावती जिल्ह्यात ६३८४, अकोला ६३७९, यवतमाळ १०३०८, बुलडाणा ६३४९ तर वाशिम जिल्ह्यातून ३०५७ एवढे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर केले आहे.      आॅटो मंजुरीशिवाय गुंता सुटणे अशक्यशिष्यवृत्तीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, मराठा, ईबीसी प्रवर्ग, अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो. मात्र, शिष्यवृत्ती अर्ज मान्यतेसाठी आॅटो मंजुरात प्रणाली लागू केल्याशिवाय गुंता सुटणार नाही, असे तज्ञ्जाचे मत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यानंतर ते ट्रॅकरद्वारे नव्या सॉफ्टवेअरमध्ये मंजूर करणे, प्राचार्यांनी त्यास मंजुरी प्रदान करावी, मोबाइल किंवा केवायसीद्वारे कन्फर्म करणे आणि त्यानंतर महाविद्यालयांवर सर्वस्वी जबाबदारी टाकणे, अशी प्रक्रिया राबविल्यास यातील बहुतांश प्रश्न सुटतील.      शिष्यवृत्तीच्या आढाव्यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकाºयांनी बैठक घेतली. महाविद्यालयांकडून अर्ज वेळेत येत नसल्याने ते कार्यालयाकडून छाननी करण्यास विलंब होतो. मात्र, आता जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार संस्था चालकांना सूचना देण्यात आल्या आहे. येत्या आठ दिवसांत प्रलंबित अर्ज निकाली काढले जातील.    - विजय साळवे, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अमरावती

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAmravatiअमरावती