शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आता बनावट बियाणे नियंत्रणासाठी मोहीम

By admin | Updated: May 11, 2015 23:56 IST

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बनावट बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नेहमीच समोर ....

सतर्कता : कृषी आयुक्तांचे कृषी विकास अधिकाऱ्यांना निर्देशअमरावती : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बनावट बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नेहमीच समोर येतो. यंदा शासनाने बनावट बियाण्याची विक्री करणाऱ्याविरुद्ध मोहीम उघडलेली दिसते. जिल्हास्तर, तालुकास्तरावर बनावट बियाण्यांचा छडा लावण्यासाठी पथके तयार करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. मागील वर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. परंतु बियाण्यांची उगवण वेळीच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. कर्ज काढूनही शेतकरी संकटातून बाहेर पडू शकला नाही. यावेळी तसे होऊ नये, म्हणून शासन गंभीर दिसत आहे. बनावट बियाणे तयार करणारी यंत्रणा हंगामाच्या वेळी सक्रिय होते. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी बियाणे कंपन्यांवर असताना चुकीचा मार्ग अनुसरला जातो. दरवेळी काही विक्रेते पकडले जातात. बियाणे जप्त कले जाते. तरीही बेमुर्वतपणा संपत नाही. शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच बियाणे उत्पादकांनीसुद्धा हातभार लावावा. शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. यावर नियंत्रण ठेवणारी पथके व्हावी, त्यामुळे बनावट बियाणे करणाऱ्यांना धडा शिकविले जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तालुका समित्या कार्यरत असतानच केवळ हंगामात नाहीतर त्यांचे कार्य वर्षभर सुरू असते. फरक इतकाच की खरीप, रबी हंगामात शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये म्हणून अधिकची सतर्कता बाळगली जाते. यावेळीही आम्ही पूर्ण शक्तीनिशी यंत्रणा सज्ज केली आहे. बनावट बियाणे उत्पादकांवर फौजदारी दाखल कराबनावट बियाणे उत्पादकांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. शेतकऱ्यांच्या माथी चुकीचे बियाणे लादणाऱ्यांची मुळीच गय करु नका, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कृषी आयुक्त कार्यालयाने सतर्कतेच्या सूचना दिल्या.बोगस बी-बियाणे विकण्याच्या प्रकारांना आळा घालणे ही कृषी विभागाची जबाबदारी आहे. असा प्रकार करण्यावर प्रत्येक तालुकास्तरावर विशेष पथक तैनात आहे. असे प्रकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. -उदय काथोडे, कृषी विकास अधिकारी