शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

आता उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार; संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पहिलाच उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 9:06 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यावर्षीपासून महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण समारंभासाठी पुरस्कार प्रदान करणार आहे. या प्रस्तावाला कुलगुरूंनी तत्त्वत: मान्यता दिली असून, त्याकरिता समिती गठित करण्यात आली आहे. उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार देणारे राज्यात हे विद्यापीठ पहिले ठरणार आहे. विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांकडून या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले जाणार आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार प्रत्येक महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण सोहळ्याचे आयोजन करणे हे अनिवार्य आहे. त्यानुसार संत  गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१९ पासून महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत मंजुरी दिली. मात्र, महाविद्यालये पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात माघारली आहेत. ३९४ पैकी १४४ महाविद्यालयांनीच पदवी वितरण समारंभ आयोजनाबाबत विद्यापीठाकडे अहवाल पाठविले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने उर्वरित २५० संस्थाध्यक्ष, प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. दरम्यान, महाविद्यालयांनी स्वयंस्फूर्तीने पदवी वितरण समारंभ आयोजित करून विद्यार्थ्यांचा गौरव करावा, यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उत्कृष्ट पदवी वितरणासाठी पुरस्कार बहाल केला जाणार आहे. यात २०१९ या वर्षातील पदवी वितरण समारंभ ग्राह्य धरण्यात येणार आहे. महाविद्यालयांनी पाठविलेल्या पदवी वितरण समारंभ अहवाल पुस्तक रूपात तयार करण्याचे प्रस्तावित आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय आणि प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाणार आहे.

समिती तयार करणार नियमावली, अटी पुरस्काराच्या अटी, नियमावली तयार करण्याची जबाबदारी कुलगुरूंनी गठित के लेल्या समितीकडे सोपविली आहे. महाविद्यालयाचा परिसर, पदवी वितरणाचे स्वरूप, मान्यवरांची उपस्थिती, सामाजिक, शिक्षणक्षेत्राची व्याप्ती आदी बाबींचा यात समावेश असेल. समितीने तयार केलेला अहवाल परीक्षा मंडळ आणि पुढे व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयार्थ ठेवण्यात येणार आहे. एकदा व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान करताच महाविद्यालयांना उत्कृष्ट पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

महाविद्यालयस्तरावर पदवी वितरण समारंभाची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप वाढीस लागावे, यासाठी पदवी वितरण पुरस्कार देण्याचा मानस आहे. कुलगुरूंनी त्यास मान्यता प्रदान केली आहे. आता काही औपचारिक बाबी शिल्लक असून, मेपर्यंत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. महाराष्ट्र दिनी पुरस्कार वितरण केला जाणार आहे. - हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.