शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

अतिक्रमित धार्मिक स्थळांना बजाविल्या नोटीस

By admin | Updated: September 23, 2015 00:10 IST

वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच जातीय तेढ निर्माण करणारी अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याबाबत नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शहरात २०८ स्थळे : २००९ नंतरच्या देवस्थानांची शोधमोहीमअमरावती : वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच जातीय तेढ निर्माण करणारी अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याबाबत नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २००९ नंतरची धार्मिक स्थळे जमिनदोस्त करण्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला असून शहरात २०८ अतिक्रमित धार्मिक स्थळे असल्याचे सर्वक्षणाअंती स्पष्ट झाले आहे.अमरावती शहराचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाला असून या शहराची वाहतूक व्यवस्था, मूूलभूत सोयीसुविधा, पाणीपुरवठा आदी सोयी नागरिकांना नियोजनबद्ध पध्दतीने पुरविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आडकाठी ठरणाऱ्या अतिक्रमीत धार्मिक स्थळांना हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यानुसार पाचही झोननिहाय अतिक्रमित धार्मिक स्थळांना नोटीस बजावून ते हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील अतिक्रमित धार्मिक स्थळे न हटविल्याबद्दल शासनावर ताशेरे ओढले आहेत. विनापरवानगी तयार झालेली धार्मिक स्थळे हटवून तसा अहवाल उच्च न्यायालयाला पाठविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांच्या मुद्यांवरून ओढलेल्या ताशेऱ्यांमुळे शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून त्यांच्या हद्दीतील अतिक्रमित धार्मिक स्थळे जमीनदोस्त करुन तसा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या धार्मिक स्थळांबाबत एका समितीचे गठन करण्यात आले आहे. यात अध्यक्षपदी महापालिका आयुक्त तर सदस्यपदी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सदस्यांचा समावेश आहे. आयुक्त गुडेवार यांनी पाचही झोनच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेत या धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याबाबत ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. अतिक्रमित धार्मिक स्थळांची पाहणी करण्याची जबाबदारी अभियंत्यांवर सोपविली आहे. (प्रतिनिधी)सहायक आयुक्तांवर सोपविली जबाबदारीशहरातील अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याची जबाबदारी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पाचही झोनच्या सहायक आयुक्तांवर सोपविली आहे. २०८ अतिक्रमित धार्मिक स्थळे हटवून हा अहवाल समितीपुढे सादर करावयाचा आहे. २००९ नंतरची धार्मिक स्थळे हटविण्यात न आल्यास महापालिकेला जबाबदार धरले जाणार आहे.