शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:40 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियोजन शून्य, नागरिकांचे बेहाल : मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ जलसाठा शिल्लक, मजीप्राचे नियोजन शुन्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे आयुर्मान संपल्याचे रडगाणे गाणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे लाखो नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. अलीकडे ना भारनियमन, ना जलवाहिनी फुटली तरीही सहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा डाव अधिकारी रचत आहेत. तर दुसरीकडे मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे.

मजीप्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा लवाजमा असताना अमरावतीसह बडनेरा शहरात गत काही महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठ्याला फाटा दिला जात आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, पाण्याचा वापर वाढतो, हे सर्वश्रुत आहे. याचा बागुलबुवा करून मजिप्राचे अभियंते जबाबदारीतून हात झटकत असल्याचे दिसून येते. नियमित पाणीपुरवठा करू अशी शेलकी मिरवणारी मजिप्राचे अभियंते आता सहा दिवसांनी पाणीपुरवठा करीत असल्यामुळे ते कसे कर्तव्य बजावत आहे, हे दिसून येते. अप्पर वर्धा धरणातून मुख्य जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणी ओढले तर ती फुटेल असा स्वतःहूनच अंदाज मजिप्राचे अभियंते बांधत आहेत. तथापि, पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याऐवजी दिवसाआड तर दूरच आता सहा दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

दरवर्षीच येतो उन्हाळा...उन्हाळ्यात कुलर, झाडांना पाणी, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर वाढल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, उन्हाळा हा दरवर्षीच येतो, याचा विसर या अभियंत्यांना पडल्यानेच यंदा सहा दिवसांनी पाणीपुरवठ्याचा प्रताप मजिप्राने केला आहे.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक केव्हा?अमरावती, बडनेरा शहरांत मजिप्राकडून पाणी पुरवठ्याचे नियोजनच नाही. कधी रात्री १२, तर कधी १ वाजतानंतर पाणीपुरवठा केला जातो. वेळापत्रक निश्चित नाही. अवेळी पाणीपुरवठ्याने सर्वांचे हाल होत आहेत.

आमदार, खासदारांनी द्यावे लक्षउन्हाळात नागरिकांची पाणीपुरवठ्याची मागणी पूर्णत्वासाठी आता आमदार, खासदारांना लक्ष द्यावे लागेल, अशी स्थिती आहे. अवेळी पाणीपुरवठा, विशिष्ट भागातच नियमित पाणी देणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लागेबांधे, निरंकुश कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवर घालावा लागणार आहे

अमृत योजनेच्या पूर्णत्वास अडीच वर्षे लागणारमंजूर झालेल्या अमृत योजना टप्पा-२ या पूर्णत्वास जाण्यास किमान दोन ते अडीच वर्षे लागणार आहेत. या योजनेत जलवाहिनीचे नवीन स्टील पाइप अंथरले जाणार आहेत. नव्याने जलशुद्धीकरण केंद्र, नागरी वस्त्यांमध्ये जलवाहिनी, जलकुंभसाकारले जाणार आहेत.

"दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे."- संजय लेवरकर, उपकार्यकारी अभियंता, मजिप्रा.

टॅग्स :Amravatiअमरावतीwater transportजलवाहतूक