शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:40 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियोजन शून्य, नागरिकांचे बेहाल : मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ जलसाठा शिल्लक, मजीप्राचे नियोजन शुन्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे आयुर्मान संपल्याचे रडगाणे गाणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे लाखो नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. अलीकडे ना भारनियमन, ना जलवाहिनी फुटली तरीही सहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा डाव अधिकारी रचत आहेत. तर दुसरीकडे मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे.

मजीप्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा लवाजमा असताना अमरावतीसह बडनेरा शहरात गत काही महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठ्याला फाटा दिला जात आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, पाण्याचा वापर वाढतो, हे सर्वश्रुत आहे. याचा बागुलबुवा करून मजिप्राचे अभियंते जबाबदारीतून हात झटकत असल्याचे दिसून येते. नियमित पाणीपुरवठा करू अशी शेलकी मिरवणारी मजिप्राचे अभियंते आता सहा दिवसांनी पाणीपुरवठा करीत असल्यामुळे ते कसे कर्तव्य बजावत आहे, हे दिसून येते. अप्पर वर्धा धरणातून मुख्य जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणी ओढले तर ती फुटेल असा स्वतःहूनच अंदाज मजिप्राचे अभियंते बांधत आहेत. तथापि, पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याऐवजी दिवसाआड तर दूरच आता सहा दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

दरवर्षीच येतो उन्हाळा...उन्हाळ्यात कुलर, झाडांना पाणी, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर वाढल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, उन्हाळा हा दरवर्षीच येतो, याचा विसर या अभियंत्यांना पडल्यानेच यंदा सहा दिवसांनी पाणीपुरवठ्याचा प्रताप मजिप्राने केला आहे.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक केव्हा?अमरावती, बडनेरा शहरांत मजिप्राकडून पाणी पुरवठ्याचे नियोजनच नाही. कधी रात्री १२, तर कधी १ वाजतानंतर पाणीपुरवठा केला जातो. वेळापत्रक निश्चित नाही. अवेळी पाणीपुरवठ्याने सर्वांचे हाल होत आहेत.

आमदार, खासदारांनी द्यावे लक्षउन्हाळात नागरिकांची पाणीपुरवठ्याची मागणी पूर्णत्वासाठी आता आमदार, खासदारांना लक्ष द्यावे लागेल, अशी स्थिती आहे. अवेळी पाणीपुरवठा, विशिष्ट भागातच नियमित पाणी देणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लागेबांधे, निरंकुश कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवर घालावा लागणार आहे

अमृत योजनेच्या पूर्णत्वास अडीच वर्षे लागणारमंजूर झालेल्या अमृत योजना टप्पा-२ या पूर्णत्वास जाण्यास किमान दोन ते अडीच वर्षे लागणार आहेत. या योजनेत जलवाहिनीचे नवीन स्टील पाइप अंथरले जाणार आहेत. नव्याने जलशुद्धीकरण केंद्र, नागरी वस्त्यांमध्ये जलवाहिनी, जलकुंभसाकारले जाणार आहेत.

"दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे."- संजय लेवरकर, उपकार्यकारी अभियंता, मजिप्रा.

टॅग्स :Amravatiअमरावतीwater transportजलवाहतूक