शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

ना भारनियमन, ना तांत्रिक दोष तरीही सहा दिवसआड पाणीपुरवठा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:40 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियोजन शून्य, नागरिकांचे बेहाल : मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ जलसाठा शिल्लक, मजीप्राचे नियोजन शुन्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे आयुर्मान संपल्याचे रडगाणे गाणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे लाखो नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. अलीकडे ना भारनियमन, ना जलवाहिनी फुटली तरीही सहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा डाव अधिकारी रचत आहेत. तर दुसरीकडे मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे.

मजीप्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा लवाजमा असताना अमरावतीसह बडनेरा शहरात गत काही महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठ्याला फाटा दिला जात आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, पाण्याचा वापर वाढतो, हे सर्वश्रुत आहे. याचा बागुलबुवा करून मजिप्राचे अभियंते जबाबदारीतून हात झटकत असल्याचे दिसून येते. नियमित पाणीपुरवठा करू अशी शेलकी मिरवणारी मजिप्राचे अभियंते आता सहा दिवसांनी पाणीपुरवठा करीत असल्यामुळे ते कसे कर्तव्य बजावत आहे, हे दिसून येते. अप्पर वर्धा धरणातून मुख्य जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणी ओढले तर ती फुटेल असा स्वतःहूनच अंदाज मजिप्राचे अभियंते बांधत आहेत. तथापि, पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याऐवजी दिवसाआड तर दूरच आता सहा दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

दरवर्षीच येतो उन्हाळा...उन्हाळ्यात कुलर, झाडांना पाणी, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर वाढल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, उन्हाळा हा दरवर्षीच येतो, याचा विसर या अभियंत्यांना पडल्यानेच यंदा सहा दिवसांनी पाणीपुरवठ्याचा प्रताप मजिप्राने केला आहे.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक केव्हा?अमरावती, बडनेरा शहरांत मजिप्राकडून पाणी पुरवठ्याचे नियोजनच नाही. कधी रात्री १२, तर कधी १ वाजतानंतर पाणीपुरवठा केला जातो. वेळापत्रक निश्चित नाही. अवेळी पाणीपुरवठ्याने सर्वांचे हाल होत आहेत.

आमदार, खासदारांनी द्यावे लक्षउन्हाळात नागरिकांची पाणीपुरवठ्याची मागणी पूर्णत्वासाठी आता आमदार, खासदारांना लक्ष द्यावे लागेल, अशी स्थिती आहे. अवेळी पाणीपुरवठा, विशिष्ट भागातच नियमित पाणी देणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लागेबांधे, निरंकुश कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवर घालावा लागणार आहे

अमृत योजनेच्या पूर्णत्वास अडीच वर्षे लागणारमंजूर झालेल्या अमृत योजना टप्पा-२ या पूर्णत्वास जाण्यास किमान दोन ते अडीच वर्षे लागणार आहेत. या योजनेत जलवाहिनीचे नवीन स्टील पाइप अंथरले जाणार आहेत. नव्याने जलशुद्धीकरण केंद्र, नागरी वस्त्यांमध्ये जलवाहिनी, जलकुंभसाकारले जाणार आहेत.

"दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे."- संजय लेवरकर, उपकार्यकारी अभियंता, मजिप्रा.

टॅग्स :Amravatiअमरावतीwater transportजलवाहतूक