शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव, वनसंरक्षणार्थ गोळीबारात मृत्यू झाल्यास थेट फौजदारी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:11 IST

(कॉमन) गणेश वासनिक अमरावती : वन्यजीव अथवा वनसंरक्षणार्थ गोळीबारात घटनास्थळी कोणी व्यक्ती जखमी किंवा मृत्यू झाल्यास अशावेळी पोलीस विभागाने ...

(कॉमन)

गणेश वासनिक

अमरावती : वन्यजीव अथवा वनसंरक्षणार्थ गोळीबारात घटनास्थळी कोणी व्यक्ती जखमी किंवा मृत्यू झाल्यास अशावेळी पोलीस विभागाने अगोदर चौकशी करावी. घटनेचे गांभीर्य जाणून घ्यावे. त्यानंतर फौजदारी कारवाई करावी, असे पत्र वनविभागाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठविले आहे.

वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) संजीव गौड यांनी २३ डिसेंबर २०२० रोजी पोलीस महासंचालक (डीजी) यांना पाठविलेल्या पत्रानुसार, वनविभागाला फाैजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १९७ (३) अंतर्गत वनाधिकाऱ्यांना वनांचे संरक्षण करीत असताना वैधानिक संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या माजी प्रधान सचिव नीला सत्यनारायण यांनी ९ सप्टेंबर २००६ च्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र, संरक्षित क्षेत्र आणि वन्यजिवांचे संरक्षण करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे. सागवान, चंदन तस्कर यांच्याशी दोन हात करताना बरेचदा वनाधिकारी, वनकर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन वनांचे संरक्षण करावे लागते. वाघ, बिबट यांच्यासह अन्य वन्यजिवांचे शिकारी यांच्याशीदेखील मुकाबला करावा लागतो. वन्यजीव तस्कर, शिकाऱ्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे असतात. अशावेळी वनाधिकाऱ्यांना संरक्षणार्थासाठी प्रतिउत्तर द्यावे लागते. अशावेळी गोळीबारात कोणी जखमी किंवा मृत्यू झाल्यास पोलिसांकडून चौकशी न करता संबंधितांवर थेट फौजदारी दाखल केली जाते. ही बाब फौजदारी प्रक्रिया संहितेविरुद्ध ठरणारी असल्याचे पत्रात नमूद केले आहे. पोलिसांनी फौजदारी दाखल करावी, यात दुमत नाही. मात्र, गोळीबार प्रकरणाचे गांभीर्य जाणून घ्यावे. कोणत्या परिस्थतीत वनकर्मचारी अथवा वनाधिकाऱ्यांनी गोळीबार केला, याची सत्यता तपासून घ्यावी. त्यानंतर वनाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावी, असे पत्र एपीसीसीएफ गौड यांनी पोलीस महासंचालकांना पाठविले आहे. यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूर व पेंच येथे गोळीबारप्रकरणी वनाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल झाले आहे,

----------------------

वन विभागात यांच्याकडे आहेत शस्त्रे

- वनसंरक्षक, वनपाल : एसएलआर

- वनपरिक्षेत्राधिकारी, सहायक वनसंरक्षक, उपवनसंरक्षक : नाईन एमएम पिस्टल

-------------------

पोलीस ठाण्याला निर्देश द्यावे

वन्यजीव, वनांचे संरक्षण करताना अनुचित घटना घडल्यास वनाधिकारी, वनकर्मचारी यांच्यावर थेट फौजदारी कारवाई होऊ नये. पोलिसांत तक्रार आल्यास हमखास चौकशी करावी, त्यानंतरच संबंधितांवर घटनेचे गांभीर्य ओळखून फौजदारी कारवाई करावी, असे निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला द्यावे, असे पत्र एपीसीसीएफ गौड यांनी पत्रात म्हटले आहे..