शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"नितेश राणेंची रक्त तपासणी करावी"; बच्चू कडूंचा भाजपा आमदारावर 'प्रहार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 18:25 IST

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं.

अमरावती - विदर्भातील अमरावतीललोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन आता महायुतीत वाद निर्माण झाल्याचे उघड झालं आहे. महायुतीतील आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला थेट विरोध करत भूमिका स्पष्ट केली. तसेच, या मतदारसंघातून प्रहारच्यावतीने उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणाच कडू यांच्या प्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे, बच्चू कडूंचं वादळ थोपवण्यासाठी भाजपा काय करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यातच, आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याचा उल्लेख करत बच्चू कडूंना चिमटा काढला. त्यावर, आमदार कडू यांची खोचक प्रतिक्रिया दिली आहे.  

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यात आहे, बच्चू कडूंचंही वादळ शमेल, असे विधान आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. आमदार राणेंच्या टीकेवर आता बच्चू कडू यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलय. "खरतर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे. आम्ही शमणारे नाहीत. आम्ही सागरातील लाटा आहोत. ते राणेला माहिती नसेल. त्यामुळे राणेने याबाबत वाच्यता करु नये. मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही अमरावतीपुरतं लढत आहोत आणि मैत्रीपूर्ण लढत आहोत. तुम्हाला वाटत असेल आम्हाला छेडावं तर आमची काही हरकत नाही. सध्या महायुतीतून बाहेर पडण्याचा आमचा इरादा नाही", अशा शब्दात बच्चू कडू यांनी राणेंवर जोरदार प्रहार केला आहे. अमरावती येथील पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना कडूंनी राणेंना सुनावलं. 

वर्षा बंगल्यावर बोलला, सागर बंगल्यावर बोलला, हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. धर्म आणि जातीपेक्षा इथे लोकांचे मुद्दे महत्वाचे आहेत. शेतकऱ्यांचे मजूरांचे प्रश्न आहेत. दिव्यांग बांधवांची, विधवा भगिनींचे प्रश्न महत्वाचे आहेत. जे कष्ट करतात त्यांची अवस्था वाईट आहे. मुकबधीर विद्यार्थ्यांनी सातवीनंतर शिकू नये, असं यांचं धोरण आहे. महत्वाचे विषय घेऊन आपण लढलं पाहिजे. विषय हद्दपार होता कामा नयेत, असेही कडू यांनी म्हटले आहे.

बच्चू कडू वीस वर्षांपासून अपक्ष लढतो. ना झेंडा आहे ना नेता आहे. हमारा नेता मुंबई दिल्लीत बसले नसून आमचा नेता गावात आहे. मी शिंदे साहेबांचा आदर करतो, त्यांनी दिव्यांग मंत्रालय आम्हाला दिलं. आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहे, भाजप आणि शिंदे साहेबांना वाटलं तर, युतीचा धर्म पाळला नाही म्हणून त्यांनी आमच्यावर कारवाई करावी, असेही कडू यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Amravatiअमरावतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाBachhu Kaduबच्चू कडूNitesh Raneनीतेश राणे