शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणीय बदलास राज्यात नंदूरबार सर्वाधिक संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:15 IST

वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘टेरी’(द एनर्जी रिसोर्स संस्था)च्या सहकार्याने अनुकूलन धोरण तयार केले आहे.

ठळक मुद्दे‘टेरी’चा अहवाल सन २०३० ते २०७० या कालावधीतील वातावरण बदलाचे शास्त्रीय अनुमान

गजानन मोहोड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ‘टेरी’(द एनर्जी रिसोर्स संस्था)च्या सहकार्याने अनुकूलन धोरण तयार केले आहे. यामध्ये सन १९७० ते २००० या कालखंडातील सरासरी हवामान व तापमानाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सन २०३० ते २०७० या कालखंडातील वातावरणीय बदलांचे शास्त्रोक्त अनुमान काढले आहे. यामध्ये वातावरणीय बदलास सर्वाधिक अतिसंवेदनशील निर्देशांकांत (व्हर्नेबिलिटी इंडेक्स) नंदूरबार जिल्ह्याचा समावेश आहे. असुरक्षिततेमध्ये जळगाव, संवेदनशीलमध्ये औरंगाबाद, तर अनुकूलनमध्ये सिंधुदूर्ग जिल्हा प्रथमस्थानी आहे.जागतिक स्तरावरील वातावरणीय बदलाचे अनुमान महाराष्ट्र राज्यात जसेच्या तसे लागू होत नसल्याने राज्याची भौगोलिक स्थिती व स्थान लक्षात घेता शास्त्रोक्त अनुमान काढण्यात आले. यासाठी यु.के.मेट, टेरी यासंस्थांद्वारा रिजन क्लॉयमेट मॉडेलिंग सिस्टम व एचएडीआरएम३पी या दोन मॉडेलची निवड करून अनुमान काढण्याचे काम केले आहे. या अनुमानाची पडताळणी करण्यासाठी करण्यासाठी सन १०७० ते २००० या कालावधीतील राज्य शासनाच्या विविध विभागाकडची सांखिकी माहिती उपलब्ध करून देण्यात येऊन प्रक्षेपित अंदाजांची पडताळणी करण्यात आली व या अहवालानुसार राज्यातील विभागनिहाय तापमान व पर्जन्यमानातील होणाºया संभाव्य बदलाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. जागतिक वातावरणीय बदलामुळे राज्यात कमालपेक्षा किमान तापमानाचे सरासरी तापमान वाढणार आहे व यामुळेच पर्जन्यमान व उष्णता निर्देशांकात बदल होणार असल्याचे अनुमान नोंदविण्यात आलले आहे. या बदलास सामोरे जाताना महत्त्वाच्या १४ शिफारसी राज्याचे वातावरणीय बदल अनुकूलन धोरणात करण्यात आलेल्या आहेत.फळपिकांवर कीड व रोग वाढणारसन २०३०, २०५० व २०७० या कालखंडात वाढते तापमान व आर्द्रतेमधील बदलामुळे डाळींब, द्राक्षे, केळी, आंबा व संत्रा या पिकांवर रोगराई वाढणार आहे. पिकांची तग धरण्याची क्षमता कमी होणार आहे. अनियमित पाऊस यासाठी पोषक राहणार असल्यामुळे सरासरी उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होणार आहे. रोगराईस पोषक वातावरणामुळे मलेरिया, डेंग्यू आजाराची क्षेत्रव्याप्ती वाढणार आहे. संभावित अतिवृष्टीमुळे लोकवस्तीवर विपरित परिणाम होईल. वाढणाºया उष्णतामानामुळे उर्जेची मागणी वाढणार आहे.वातावरणीय बदलास अतिसंवेदनशील प्रथम दहा जिल्हेअतिसंवेदनशील निर्देशांक- नंदूरबार, धुळे, बुलडाणा, जळगाव, हिंगोली, नाशिक, जालना, गोंदिया, वाशिम गडचिरोली.संवेदनशील : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, ठाणे, नांदेड, अकोला, रायगड, बुलडाणा, वाशिम, यवतमाळअसुरक्षित : औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, अकोला, नंदूरबार, नाशिक, रायगड, बुलडाणा, वाशिम, यवतमाळअनुकूलन : सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, वर्धा, रायगड, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, भंडारा

टॅग्स :environmentवातावरण